बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी फलंदायी

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये प्ले ऑफ राउंडसाठी अर्थात पुढील फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या चार संघांचा समावेश आहे. यापैकी मुंबईचे आतापर्यंत १३ साखळी सामने झाले आहेत. यातील आठ सामन्यांमध्ये मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईचा संघ पाच सामन्यांत हरला आहे. यामुळे गुणतक्त्यात १६ गुणांसह मुंबई चौथ्या स्थानी आहे. दिल्ली विरुद्धच्या विजयानंतर मुंबई चौथ्या स्थानी पाय घट्ट रोवून उभी आहे. मुंबईची सरासरी धावगती (नेट रनरेट) +१.२९२ आहे. मुंबईच्या या कामगिरीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची महत्त्वाची भूमिका आहे.


दुखापतीमुळे मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराह खेळला नव्हता. या सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला. पण बुमराह परतला आणि मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत सुधारणा झाली. यामुळे जसप्रीत बुमराहची एन्ट्री मुंबई इंडियन्ससाठी फलंदायी ठरली आहे.



मुंबई इंडियन्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरी



  1. २३ मार्च - चेन्नई सुपरकिंग्सचा चार गडी राखून विजय - बुमराह खेळला नाही

  2. २९ मार्च - गुजरात टायटन्सचा ३६ धावांनी विजय - बुमराह खेळला नाही

  3. ३१ मार्च - कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा आठ गडी राखून विजय - बुमराह खेळला नाही

  4. ४ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्सचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला नाही

  5. ७ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला; दुखापतीतून सावरला पण सामन्यात प्रभाव दिसला नाही

  6. १३ एप्रिल - दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  7. १७ एप्रिल - हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा चार गडी राखून विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  8. २० एप्रिल - चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  9. २३ एप्रिल - हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात गडी राखून विजय - बुमराह खेळला; एक बळी घेतला

  10. २७ एप्रिल - लखनऊ विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५४ धावांनी विजय - बुमराह खेळला; चार बळी घेतले

  11. १ मे - राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा १०० धावांनी विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  12. ६ मे - गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून डकवर्थ लुईसने विजय - बुमराह खेळला; दोन बळी घेतले

  13. २१ मे - दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ५९ धावांनी विजय - बुमराह खेळला; तीन बळी घेतले


Comments
Add Comment

Valluri Ajaya Babu : कोण आहे वल्लुरी अजय बाबू ? आधी वडिलांनी जिंकले पदक , १६ वर्षानंतर मुलाने बापाला टाकले मागे

ग्लासगो : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत आतापर्यंत १० पदके जिंकली आहेत. यात

IND VS SL : बीसीसीआयची मोठी घोषणा! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्समध्ये नाशिकच्या सर्वेशची चमक! उंच उडीत भारताला जिंकून दिले पहिले रौप्य पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी

CWG 2026 : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ वेटलीफटिंगमध्ये भारताचा दबाब कायम; माणिपूरच्या बिंद्यारानीने सलग दुसर्‍यांदा जिंकले पदक

ग्लासगो : कॉमन वेल्थ गेम्स २०२६ ग्लासगो येथे सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय संघाने एकूण १० पदक जिंकले आहेत.

WI vs PAK : ५ षटकात पाच विकेट्स! वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात घडला इतिहास

त्रिनिदाद : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात सध्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात

Commonwealth Games 2026 : भारतीय खेळाडूंचा जलवा! शर्मिला धनखडच्या सुवर्णपदकासह राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात १० पदकांची भर

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम राखली आहे.