Chhagan Bhujbal: ढोल ताशाच्या गजरात छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

"हा हां मैं देर से आया हुं, दुरुस्त आया हुं", मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळांनी नाशिककरांसमोर व्यक्त केल्या भावना


नाशिक:  कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे प्रथमच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यादरम्यान आज त्यांचा नाशिक येथील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे  जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जनतेच्या प्रेमामुळे आपण विविध वेळा मंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळी आपण पहिले प्रदेशाध्यक्ष होतो. या पक्षाच्या बांधणीसाठी आपण आपण महत्वाचे काम केले आहे. मात्र गेल्या काळात बाजूला राहिल्याने थोड दुःख आपल्याला नक्कीच झालं होते. मात्र त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पुन्हा आपल्या मंत्री पदाची शपथ घेण्याचे कळविले. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण मंत्रिमंडळात असावे याबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे आपण मंत्री पदाची शपथ घेतली असल्याचे सांगत "हा हां मैं देर से आया हुं, दुरुस्त आया हुं" अशा पंक्तीतून आपल्या भावना व्यक्त केल्या.



'नाशिकचा मी बालक': छगन भुजबळ


कार्यकर्त्यांनी आणि नाशिककरांनी केलेल्या सत्कारानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान मुंबई, पुणे प्रमाणे नाशिकला देखील पुढे आणण्याचा आपला प्रयत्न कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नाशिकचा विकास वर्षानूवर्ष होत असून, विविध उद्योगधंदे आणि आर्थिक सुबत्तेबरोबरच नाशिक पर्यावरणपूरक ठेवण्याचा देखील प्रयत्न असेल असे आश्वासन त्यांनी दिले. यादरम्यान गोदावरीचे पाणी प्रदूषणमुक्त ठेवण्यावर देखील त्यांनी विशेष भर दिला.

Comments
Add Comment

मला चिंता नाही, सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्मवर प्रशिक्षक गौतम गंभीरचा पूर्ण पाठिंबा!

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-२० मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत राज्य आणि केंद्र सरकारे प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात

अयोध्येत राम मंदिराचे काम पूर्णत्वास! मुख्य मंदिरासह सहा उपमंदिरांचेही काम पूर्ण

अयोध्या : शतकानुशतके चाललेल्या प्रतीक्षेनंतर अखेर प्रभू श्रीरामांच्या भक्तांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता आली

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर ‘कांतारा- चैप्टर 1’ या तारखेला दिसणार ओटीटीवर!

मुंबई : ऋषभ शेट्टीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा- चैप्टर 1’ आता लवकरच ओटीटीवर येणार आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये