कृषी उत्पन्न बाजार समितीची ५०० कोटींची आर्थिक उलाढाल

शेतमालाची आवक वाढली : साहेबराव रोहोम


कोपरगाव : येथील कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५०० कोटीचे वर आर्थिक उलाढाल झाली असुन, बाजार समितीला ५१ कोटीचे उत्प़न्ऩ झालेले आहे. बाजार समितीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्प़न्ऩ व नफा झालेला आहे. माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे तसेच राजेश परजणे, नितीन औताडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे यांचे अधिपत्याखाली संचालक कार्यरत असुन ते शेतकरी हित लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना सर्व सुविधा उपलब्ध़ करुन देण्यासाठी सदैव तत्प़र आहेत.


बाजार समितीच्या मुख्य़ मार्केट मध्ये व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतक-यांचे शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी बांधव इतरत्र न जाता येथेच आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. कोपरगांव तालुक्याबरोबरच शेजारील वैजापुर, राहाता, येवला, श्रीरामपुर व सिन्ऩर या तालुक्यातील शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीस आणतात.सन २०२४-२५ या वर्षात २१ लाख क्विंटल आवक झालेली आहे.तसेच उपबाजार आवार मोर्विस धामोरी फाटा या ठिकाणी लवकरच कांदा व भुसार लिलाव सुरू होणार असुन संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पध्दतीने सुरू असुन शेतकरी, व्यापारी व सर्व बाजार घटकांसाठी जास्तीत जास्त़ सुविधा उपलब्ध़ करून देणार आहे. भाजीपाला मार्केट येथे बाजार समितीने ११० × ५० साईजचे शेतकरी भाजीपाला लिलावाकरीता सेल हॉल बांधकाम पुर्ण केलेले असुन भाजीपाला धुण्यासाठी ओटा, पाणी व्यवस्था, टॉयलेट ब्लॉक व लाईट सुविधा केलेली आहे.जनावरे बाजार येथे बाजार समितीने टॉयलेट, पाणी आहाळ -४, जनावरे चढ उतार करण्यासाठी धक्का, जनावरे बांधण्यासाठी दावणी तसेच पार्किंग परिसर मुरूमीकरण केला आहे. जनावरे बांधण्यासाठी शेड व्यवस्था व शेतकरी, व्यापारी यांचेसाठी जारव्दारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. तेथील रस्ता डांबरीकरण करणेचे काम मंजुर असुन ते सुरू होणार आहे.


बाहेरील राज्यातील व स्थानिक व्यापारी यांचे स्प़र्धेतुन शेतक-यांच्या शेतमालाला वाजवी किंमत मिळते तसेच चोख वजनमाप, काटला नाही, रोख पेमेंट यामुळे बाजार समितीवर शेतक-यांचा विश्वास असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक मोठया प्रमाणात होत आहे. शेतक-यांनी आपला शेतमाल कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे विक्रीस आणुन आपला फायदा करुन घ्यावा असे आवाहन सचिव एन.एस.रणशूर यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन