कल्याण दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना निधीतून मदत देण्याचे एकनाथ शिंदे यांचे निर्देश

ठाणे : कल्याण पूर्व येथील मंगलराघो नगर परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने उपचार करावेत. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढून सदर इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यास त्यांनी सांगितले.

कल्याण पूर्व येथील या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामावेळी अचानक मधला स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून या दुर्घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच त्यानंतर त्यांनी बचाव कार्याला वेग आणण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी बोलवण्यास सांगितले. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या रहिवाशांवर गरज असल्यास खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत असेही निर्देश दिले. तसेच यात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटूंबियांना लवकरात लवकर शासकीय मदत दिली जाईल असेही सांगितले. तसेच या बचाव कार्याचा आढावा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांनी स्वतः त्यात जातीने लक्ष घालावे असेही निर्देश दिले. या दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या मदतकार्याचा उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः वेळोवेळी आढावा घेत असून लागेल ती सर्व मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Comments
Add Comment

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना