ठाणेकरांनो येथे लक्ष द्या!  कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणी पुरवठा गुरूवारपासून शुक्रवारपर्यंत बंद राहणार

ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील.


परिणामी, गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग, तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहील.


तसेच, शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

एमपीएससीच्या ९३८ पदांसाठी भरती जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षासाठी जाहिरात

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा