पीसीबीने बाबर आझम, रिझवान आणि शाहीनला पाकिस्तान संघातून केले बाहेर

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघातून तीन दिग्गज खेळाडूंचा एकाच वेळी काढल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी यांना पाकिस्तान संघातून काढले आहे.बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी या तिघांची निवड केली नाही.

बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे. २७ मे पासून बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांनी टी२० मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २१ मे रोजी १६ सदस्यीय टी२० संघाची घोषणा केली. पण या मालिकेसाठी निवडलेल्या संघात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी नाहीत. या संघाची धुरा सलमान अली आगाच्या खांद्यावर दिली आहे. तर शादाब खानला संघाचा उपकर्णधार म्हणून पदभार दिला आहे. पाकिस्तान संघाचा हेड कोच म्हणून जबाबदारी सोपवल्यानंतर माइक हेसनची ही पहिलीच मालिका आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी सारख्या दिग्गज खेळाडूंना संघाबाहेर करण्याचं खरं कारण काही समोर आलेलं नाही. पण पीसीबीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये स्पष्ट केलं की, संघात त्याच १६ खेळाडूंची निवड केली ज्यांचं पीएसएलमध्ये चांगलं प्रदर्शन राहीलं आहे.

बाबर आझमने पीएसएलच्या १० सामन्यात २८८ धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तर रिझवानने 10 सामन्यात एका शतकी खेळीसह 367 धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने १० सामन्यात फक्त ११ विकेट घेतल्या. यापूर्वी एप्रिल महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या संघातही या तिघांना स्थान दिलं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या तिघांना टी20 संघासाठी योग्य नसल्याचं गृहीत धरत आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण