महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

मुंबई : हवामान विभागाने सुधारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आधी मान्सून मंगळवार २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेली प्रणाली किती तीव्र होते आणि त्यामुळे वातावरणातील किती आर्द्रता या प्रणालीकडे खेचली जाते, यावर मान्सूनचा पुढचा प्रवास ठरेल. मात्र, अरबी समुद्रामध्ये बुधवारी चक्रीय वातस्थिती निर्माण होत आहे. यामुळे गुरुवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. यामुळे मुंबई, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वारे ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


हवामान विभागाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.


पुणे घाट परिसर - गुरुवारी आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट
अहिल्यानगर - बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव - बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सातारा घाट परिसर - बुधवारी, गुरुवारी ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी - बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग - बुधवार, गुरुवार, शनिवार ऑरेंज अलर्ट
रायगड - गुरुवारी ऑरेंज अलर्ट

Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह