महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

मुंबई : हवामान विभागाने सुधारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरपर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आधी मान्सून मंगळवार २७ मे पर्यंत केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.


केरळमध्ये मान्सून पोहोचल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेली प्रणाली किती तीव्र होते आणि त्यामुळे वातावरणातील किती आर्द्रता या प्रणालीकडे खेचली जाते, यावर मान्सूनचा पुढचा प्रवास ठरेल. मात्र, अरबी समुद्रामध्ये बुधवारी चक्रीय वातस्थिती निर्माण होत आहे. यामुळे गुरुवारी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. यामुळे मुंबई, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वारे ताशी ३० ते ४० किमी. वेगाने वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.


हवामान विभागाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.


पुणे घाट परिसर - गुरुवारी आणि शुक्रवारी ऑरेंज अलर्ट
अहिल्यानगर - बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव - बुधवारी ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर, सातारा घाट परिसर - बुधवारी, गुरुवारी ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी - बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग - बुधवार, गुरुवार, शनिवार ऑरेंज अलर्ट
रायगड - गुरुवारी ऑरेंज अलर्ट

Comments
Add Comment

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला