सिंहगड संवर्धनासाठी नवीन ‘नियमावली'

नियमांचे पालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई


पुणे:सिंहगड किल्ला हा पर्यटक आणि शिवप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे नेहमीच मोठी गर्दी होत असते. पावसाळा सुरू झाल्यानंतर या किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वाढते. जूनपासून येथे पर्यटनाचा हंगाम सुरू होत असून यंदा पर्यटकांसाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. वनविभागाने १ जून २०२५ पासून सिंहगडावर जाणाऱ्यांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे पालन न केल्यास कडक दंडात्मक कारवाई होणार आहे.


तसेच गडावर प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने नुकत्याच झालेल्या बैठकीत प्लास्टिक बंदीचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, वनविभागाने हा निर्णय घेतला असून १ जूनपासून प्लास्टिक बंदी काटेकोरपणे लागू होईल. पर्यटकांना आता येथे प्लास्टिकच्या बाटल्यांसाठी अनामत रक्कम (डिपॉझिट) भरावी लागेल. गडावरून परतताना ती परतदिली जाईल.


गडावर कोणी प्लास्टिकचा कचरा फेकला, तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. त्याचप्रमाणे वनविभागाचे सहायक वनसंरक्षक दीपक पवार यांनी रविवारी सिंहगडावरील विक्रेत्यांची बैठक घेतली. विक्रेत्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विक्रेत्यांना प्लास्टिक बंदीच्या नियोजनासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.


या नव्या नियमांमुळे सिंहगडावरील स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे. तर अतिक्रमण हटवल्याने किल्ल्याचे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील.


अतिक्रमणमुक्त किल्ल्यांचा संकल्प


पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगडासह सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला