छत्तीसगड : २७ नक्षलवादी ठार, चार जिल्ह्यांत नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझहमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात चकमक सुरू आहे. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.


सुरक्षा पथकांकडून यावेळी जिल्हा राखीव रक्षक हे नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा पथकांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी मार्गदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ताज्या कारवाईत नक्षलवादी रुपेश आणि आणखी काही नक्षलवाद्यांचे नेते यांना सुरक्षा पथकांनी घेरले आहे.


नक्षलवाद्यांच्या सामर्थ्याचा बीमोड करण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा पथकांकडील एक जवान जखमी झाला आणि एक जण हुतात्मा झाला.

Comments
Add Comment

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक