छत्तीसगड : २७ नक्षलवादी ठार, चार जिल्ह्यांत नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबुझहमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. दंतेवाडा, नारायणपूर, विजापूर आणि कोंडागाव जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलात चकमक सुरू आहे. आतापर्यंत २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.


सुरक्षा पथकांकडून यावेळी जिल्हा राखीव रक्षक हे नक्षलवाद्यांविरुद्धच्या चकमकीत आघाडीवर आहेत. दोन्ही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरक्षा पथकांना नक्षलवाद्यांविरुद्धच्या कारवाईसाठी मार्गदर्शन करत आहेत. छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या ताज्या कारवाईत नक्षलवादी रुपेश आणि आणखी काही नक्षलवाद्यांचे नेते यांना सुरक्षा पथकांनी घेरले आहे.


नक्षलवाद्यांच्या सामर्थ्याचा बीमोड करण्यासाठी व्यापक कारवाई सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा पथकांकडील एक जवान जखमी झाला आणि एक जण हुतात्मा झाला.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे