अमृत भारत स्थानकांमध्ये उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा प्रतिबिंबित

गोरखपूर: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून या अंतर्गत व्यावसायिक आणि नागरिक- केंद्रित सेवांना प्रोत्साहन दिले जाईल. देशभरात अशी १ हजार ३०० हून अधिक रेल्वे स्थानके बांधली जात आहेत. या योजनेअंतर्गत, रेल्वे स्थानके ही शहर केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, १०३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, उत्तर प्रदेशातील १९ स्थानके असून त्यात बलरामपूर, सिद्धार्थनगर, स्वामी नारायण छापिया, मैलानी, गोला, गोकर्णनाथ, रामघाट हॉल्ट, इज्जतनगर, बरेली सिटी, उजनी, हाथरस सिटी, सुरेमानपूर, बिजनौर, सहारनपूर, फतेहाबाद, गोवर्धन, इदगाह आग्रा जंक्शन, पोखरायण, गोविंदपुरी यांचा पुनर्विकास करण्यात आला. १९० कोटींहून अधिक खर्चाने ही विकसित स्थानके स्थानिक संस्कृती आणि उत्कृष्ट प्रवासी सुविधांचे मिश्रण आहेत. या स्थानकांमध्ये भव्यता असून यांची प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, उंच दिवे, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, आधुनिक शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ रॅम्पसारख्या सुविधा विकसित केल्या आहेत.

सिद्धार्थनगर स्टेशनवर बौद्ध संस्कृतीची झलक दिसते, जिथून देश-विदेशातील लोक भेट देऊ शकतात. सरयू नदीच्या अयोध्या काठावर असलेल्या रामघाट हॉल्ट स्टेशनवर प्रवाशांसाठी १,१६४ चौरस मीटरची एक नवीन बहुउद्देशीय इमारत केली आहे. छपिया स्टेशनला स्वामी नारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सहारनपूर स्टेशन हे शाकंभरी देवी मंदिर म्हणून ओळखले जाते त्याप्रमाणे अनुकूल डिझाइन केले गेले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, उत्तर प्रदेश आता त्या दिशेने वाटचाल करत असून जिथे प्रत्येक स्टेशन स्थानिक संस्कृती, आधुनिक वास्तुकला आणि आणि चांगल्या प्रवासी सुविधांचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.
Comments
Add Comment

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही