Himant Biswa : आसाममधून ७३ पाकिस्तानी एजंटना अटक!

ऑपरेशन आसामद्वारे पाकिस्तानला दणका


पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ गद्दारांना बेड्या ठोकल्यानंतरही गुप्तचर खातं शांत बसलेलं नाहीय. कोणत्या ना कोणत्या राज्यात पाकिस्तानी एजंट कार्यरत आहेत. धक्कादायक म्हणजे एकट्या आसाममध्ये ७३ पाकिस्तान एजंटांवर कारवाई करण्यात आलीय. आसाममध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या लेखातून...



घरभेदी आणि ट्रॅव्हल्स यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिच्या कारनाम्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या तपास यंत्रणांनी वेगाने चक्रं फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक राज्यांतील पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे एजंट्स जाळ्यात अडकले. अशीच मोठी कारवाई आसाममध्ये करण्यात आलीय. आसाममध्ये दहा - बारा नव्हे तर चक्क ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आलंय. बरं, या कारवाईची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी एक्स पोस्टद्वारे दिलीय. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं कंबरडं मोडावं, यासाठी आसाममध्ये ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच दहशतवादीविरोधी मिशन सुरू करण्यात आलंय. या मिशनचाच एक भाग म्हणून घरभेदींना पकडणं आणि त्यांना शिक्षा करणं सुरू आहे. या मिशननुसार आसामच्या चिरांग आणि होईज या जिल्ह्यातून प्रत्येकी एका पाकिस्तानी एजंटला पकडण्यात आलं. आणि त्यानंतर ७३ पाकिस्तानी एजंट्सवर कारवाई करण्यात आली.



पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आसाममध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. या घटनेची दखल मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची धमकी दिली. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सर्व घरभेद्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मिशन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. याआधी विरोधी पक्षनेता AIUDFचा आमदार अमीनुल इस्लामला अटक करण्यात आली.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटातल्या सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून त्याचा बदला घेतला. या कारवाईनंतर भारत गप्प बसलेला नाही. ज्योती मल्होत्रासारख्या अनेक घरभेद्यांना शोधून त्यांच्यावर कडक करण्याचा विडाच उचललाय. भारतातच राहून भारताविरोधात देशद्रोह करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसलीय. आणि आता हीच वेळ आहे ती म्हणजे घरभेद्यांनाही ठेचण्याची.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च