चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची महिलांची शपथ

सिंदूर यात्रेत केला भारतीय सेनेचा सन्मान


मुंबई :भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर यात्रेत शपथ घेतली. वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात मंगळवारी भारतीय सनिकांच्या सन्मानार्थ महिलांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात प्रथम सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली होती. मणीभवन चौक ते हिरोज ऑफ किलाचंद उद्यान दरम्यान निघालेल्या यात्रेत देण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी गिरगाव परिसर दणाणून गेला.


काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात निरपराध पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. भारतीय सैनिकांनी दहशतवादविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांच्या सन्मानाप्रित्यर्थ वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वात गिरगाव परिसरात सिंदूर यात्रा काढण्यात आली. या यात्रेत लाल साड्या परिधान करून हजारो महिलांनी हातात राष्ट्रध्वज घेत देशभक्तीपर घोषणांसह सहभाग घेतला. महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी सिंदूर यात्रा आयोजित करण्यात आली.


याप्रसंगी बोलताना वीरमाता अनुराधा ताई गोरे म्हणाल्या, 'शहिदांचे बलिदान कधीही वाया जात नाही, तर त्यातून अनेक वीर तयार होतात. भारत ही वीरांची भूमी आहे आणि नारीशक्तीने त्यांच्या सदैव पाठीशी उभे रहायला हवे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली