Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! उद्या पाणी जपून वापरा, 'या' भागातला पाणीपुरवठा होणार बंद

ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही


ठाणे: ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे बुधवारी (२१ मे) यादिवशी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत १२ तासांसाठी पाणी पुरवठा (Thane Water  Cut)  बंद राहणार आहे.


ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.



या भागातला पाणीपुरवठा होणार बंद


ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील  घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.  त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल,  या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Smartphone : कमी बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा स्मार्टफोन

फक्त १० हजारांच्या आत नवा झेनो २००' स्मार्टफोन लाँच मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची

RR VS DC : कर्णधार रियान परागलाच हटवले, वाचा कोण झाला नवा कर्णधार ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ चा ५२ वा सामना आज जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सुरू आहे. दुखापतीमुळे या सामन्यातून

महाराष्ट्राच्या विकासाच्या आलेखाची राष्ट्रीय स्तरावर दखल

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ 'बालस्नेही' आणि 'जलसमृद्धी'मध्ये राज्यातील ग्रामपंचायती देशात प्रथम नवी दिल्ली :

Nashik TCS Case : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी ५० पानांचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई : नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’प्रकरणी सखोल चौकशी करून राष्ट्रीय महिला आयोगाने