लोणंद रेल्वे स्थानकाचा कायापालट

२४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी २ प्लॅटफॉर्म सज्ज


पुणे : अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या निमित्ताने पत्रकारांचा पाहणी दौऱ्याचा आयोजन करण्यात आले होते. लोणंद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत दहा कोटी ४८ लाख रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केले आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने येथील सर्व कामे पूर्ण केले असून, आता या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे.

नव्या लोणंद रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग एरिया, नवीन लाईनची कामे पूर्ण, सुसज्ज रस्ते, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, २४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म सज्ज, लवकरच आणखी दोन प्लॅटफॉर्म आणि एक गुडस स्टोरेज रूम तयार होणार, प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी दोन नवीन डिजिटल बोर्ड, सीईजी कन्सल्टन्सी मार्फत रेल्वे स्थानकाचा विकास, दिवसभरात पाचशे प्रवासी करतात ये-जा, तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे, यात कोयना, महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश, स्थानकाला पर्यावरण पूरक रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी नवीन आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान यांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा विकास केला जात आहे. तब्बल १०.४७ कोटी गुंतवणुकीतून हा विकास करण्यात आला आहे. यात नवीन स्टेशन प्रवेशद्वार, आधुनिक बुकिंग ऑफिस आणि कॉन्कोर्स, नवीन प्रवेश/निर्गमन दरवाजे आणि कंपाऊंड वॉल यांचा समावेश आहे. कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग झोन करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ मध्ये आता एक नवीन प्रतीक्षालय तयार केले आहे.

 
Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस