लोणंद रेल्वे स्थानकाचा कायापालट

२४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी २ प्लॅटफॉर्म सज्ज


पुणे : अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद रेल्वे स्टेशनचा विकास करण्यात येत आहे. या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन येत्या २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या निमित्ताने पत्रकारांचा पाहणी दौऱ्याचा आयोजन करण्यात आले होते. लोणंद रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी केंद्र सरकारने आत्तापर्यंत दहा कोटी ४८ लाख रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजूर केले आहेत. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने येथील सर्व कामे पूर्ण केले असून, आता या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे.

नव्या लोणंद रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधा, सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग एरिया, नवीन लाईनची कामे पूर्ण, सुसज्ज रस्ते, प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, २४ डब्यांची गाड्या उभ्या राहण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म सज्ज, लवकरच आणखी दोन प्लॅटफॉर्म आणि एक गुडस स्टोरेज रूम तयार होणार, प्रवाशांना माहिती मिळावी यासाठी दोन नवीन डिजिटल बोर्ड, सीईजी कन्सल्टन्सी मार्फत रेल्वे स्थानकाचा विकास, दिवसभरात पाचशे प्रवासी करतात ये-जा, तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबे, यात कोयना, महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश, स्थानकाला पर्यावरण पूरक रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी नवीन आसन व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान यांच्या अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा विकास केला जात आहे. तब्बल १०.४७ कोटी गुंतवणुकीतून हा विकास करण्यात आला आहे. यात नवीन स्टेशन प्रवेशद्वार, आधुनिक बुकिंग ऑफिस आणि कॉन्कोर्स, नवीन प्रवेश/निर्गमन दरवाजे आणि कंपाऊंड वॉल यांचा समावेश आहे. कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. सर्क्युलेटिंग एरिया, पार्किंग झोन करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ मध्ये आता एक नवीन प्रतीक्षालय तयार केले आहे.

 
Comments
Add Comment

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी