येत्या १ जूनपासून 'या' दोन राज्यांमध्ये थिएटर बंद होण्याची शक्यता

हैद्राबाद : दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये येत्या १ जूनपासून थिएटर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील थिएटर पूर्ण बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राजस्व मॉडेलच्या माध्यमातून मालकाला अपूरे भाडे मिळत असल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील सिंगल-स्क्रीन थिएटर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक्झिबिटर्स असोसिएशनसोबत झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीत, प्रदर्शकांनी टक्केवारी-आ धारित मॉडेलमधील बदलाला पाठिंबा दर्शविला. त्यासोबतच औपचारिकपणे थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.

प्रदर्शक संघटनेच्या बैठकीत सुमारे ६० प्रदर्शक उपस्थित होते. ज्यात दिल राजू आणि सुरेश बाबू सारख्या फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचा समावेश होता. याशिवाय, अनेक प्रमुख चित्रपट वितरक आणि निर्मातेही अनुपस्थित होते.

दरम्यान, या प्रस्तावावर इंडस्ट्रीतल्या लोकांमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या दोन्हीही राज्यातील सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला अधिकृत जर मंजूरी मिळाली, तर बड्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो.

येत्या, १२ जून रोजी कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ प्रदर्शित होणार आहे. पवन कल्याण यांचा ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. सिंगल-स्क्रीन थिएटर्सला आता कदाचित फार मोठ्या वितरणाच्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे. परंतु मल्टिप्लेक्सला याचा त्रास होणार नाही, ते चित्रपटाची स्क्रिनिंग कायम ठेवू शकता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दलही प्रदर्शकांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रदर्शकांनी विनंती केली आहे की, ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे, ते चित्रपट लवकर ओटीटीवर रिलीज करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. फिल्म चेंबरला औपचारिक निवेदन सादर करण्यात येणार असून तोडगा काढण्यासाठी १ जूनच्या आधीच चर्चा अपेक्षित आहे, येत्या काही दिवसांत आता थिएटर्सबाबतीत आणि ओटीटी रिलीज बाबत कोणता निर्णय होतो, हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव