येत्या १ जूनपासून 'या' दोन राज्यांमध्ये थिएटर बंद होण्याची शक्यता

हैद्राबाद : दक्षिणेकडील दोन राज्यांमध्ये येत्या १ जूनपासून थिएटर बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील थिएटर पूर्ण बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

राजस्व मॉडेलच्या माध्यमातून मालकाला अपूरे भाडे मिळत असल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा या दोन राज्यांतील सिंगल-स्क्रीन थिएटर बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक्झिबिटर्स असोसिएशनसोबत झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीत, प्रदर्शकांनी टक्केवारी-आ धारित मॉडेलमधील बदलाला पाठिंबा दर्शविला. त्यासोबतच औपचारिकपणे थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला सहमती दर्शविली आहे.

प्रदर्शक संघटनेच्या बैठकीत सुमारे ६० प्रदर्शक उपस्थित होते. ज्यात दिल राजू आणि सुरेश बाबू सारख्या फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचा समावेश होता. याशिवाय, अनेक प्रमुख चित्रपट वितरक आणि निर्मातेही अनुपस्थित होते.

दरम्यान, या प्रस्तावावर इंडस्ट्रीतल्या लोकांमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या दोन्हीही राज्यातील सिंगल स्क्रिन थिएटर्स बंद करण्याच्या निर्णयाला अधिकृत जर मंजूरी मिळाली, तर बड्या सेलिब्रिटींच्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम होऊ शकतो.

येत्या, १२ जून रोजी कमल हासन यांचा ‘ठग लाईफ’ प्रदर्शित होणार आहे. पवन कल्याण यांचा ‘हरि हरा वीरा मल्लू’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे. सिंगल-स्क्रीन थिएटर्सला आता कदाचित फार मोठ्या वितरणाच्या समस्यांना तोंड देण्याची शक्यता आहे. परंतु मल्टिप्लेक्सला याचा त्रास होणार नाही, ते चित्रपटाची स्क्रिनिंग कायम ठेवू शकता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबद्दलही प्रदर्शकांनी चिंता व्यक्त केली आहे.

प्रदर्शकांनी विनंती केली आहे की, ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे, ते चित्रपट लवकर ओटीटीवर रिलीज करु नये अशी विनंती करण्यात आली आहे. फिल्म चेंबरला औपचारिक निवेदन सादर करण्यात येणार असून तोडगा काढण्यासाठी १ जूनच्या आधीच चर्चा अपेक्षित आहे, येत्या काही दिवसांत आता थिएटर्सबाबतीत आणि ओटीटी रिलीज बाबत कोणता निर्णय होतो, हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे