आसाममध्ये पाकिस्तानी समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई, आतापर्यंत ७३ एजंटना अटक

  43

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात सातत्याने गुप्तहेर पकडले जात आहेत. केवळ आसाममध्ये आतापर्यंत ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.


एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की चिरांग आणि होजई जिल्ह्यातून एका-एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच राष्ट्र विरोधींना पकडणे आणि त्यांना दंड करण्याचे आमचे मिशन सुरू आहे. ७३ पाकिस्तानी एजंटना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.


याआधी विपक्षी एआययूडीएफचे आमदार अमीनुल इस्लामला पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटात सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती.  याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एनएसएकडून ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशी सुरू आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी २ मेला दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची धमकी दिली होती. तसेच देशद्रोहींविरुद्ध ही कारवाई सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत