आसाममध्ये पाकिस्तानी समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई, आतापर्यंत ७३ एजंटना अटक

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात सातत्याने गुप्तहेर पकडले जात आहेत. केवळ आसाममध्ये आतापर्यंत ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.


एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की चिरांग आणि होजई जिल्ह्यातून एका-एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच राष्ट्र विरोधींना पकडणे आणि त्यांना दंड करण्याचे आमचे मिशन सुरू आहे. ७३ पाकिस्तानी एजंटना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.


याआधी विपक्षी एआययूडीएफचे आमदार अमीनुल इस्लामला पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटात सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती.  याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एनएसएकडून ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशी सुरू आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी २ मेला दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची धमकी दिली होती. तसेच देशद्रोहींविरुद्ध ही कारवाई सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या