मुंबई विद्यापीठात नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम

मुंबई : मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने चारही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनावर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.


विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विदा विश्लेषण (डेटा अॅनालिटिक्स), सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापनाचाही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.



मुंबई विद्यापीठातर्फे उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.


जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम व्हायला मदत होणार आहे.


सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशीलवार माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ३ जूनपूर्वी नोंदणी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

Mumbai: परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली मोठी फसवणूक, आरोपी फरार

मुंबई : मुंबईत परदेशात उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०