मुंबई विद्यापीठात नावीन्यपूर्ण पदव्युत्तर अभ्यासक्रम

  68

मुंबई : मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांची येत्या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने चारही विद्याशाखांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनावर आधारित अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.


विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विदा विश्लेषण (डेटा अॅनालिटिक्स), सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंगसह विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु केले आहेत. तसेच मंदिर व्यवस्थापनाचाही पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.



मुंबई विद्यापीठातर्फे उद्योग, संशोधन आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊनही विविध अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.


जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अशा वैविध्यपूर्ण वातावरणात उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेसाठी सक्षम व्हायला मदत होणार आहे.


सर्व अभ्यासक्रमांची पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशीलवार माहिती मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवेशसाठी विद्यार्थ्यांनी https://mu.ac.in/admission या संकेतस्थळावर जाऊन ३ जूनपूर्वी नोंदणी करावी असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही