कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; श्रीसप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


?feature=share

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिका-यांनी अथक प्रयत्नांनी आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींना वाचविण्यात अपयश आले. अद्यापही काही जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता असल्याने बचाव मोहीम सुरुच आहे.



या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली असून त्याची स्थिती लक्षात घेता इतर रहिवाशांचीही काळजी घेतली जात आहे.


दरम्यान श्रीसप्तश्रृंगी इमारत ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. तरी काही कुटुंब तेथे वास्तव्यास होती.

Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

Mumbai : भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी BMC ने केला ७० हजार कोटींचा खर्च, एमआयएमच्या नगरसेवकाने मारला हवेत बाण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांची नसबंदी करण्यासाठी संस्थांच्या नेमणुकीला स्थायी समितीने

Mumbai : सायकल ट्रॅक नाही, उद्यानही नाही आणि तरी कोट्यवधींचा देखभालीवर खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीभोवतीचा विळखा काढून दहा मीटर परिसर मोकळा करण्यात

Mithi नदीचा गाळ काढण्याच्या प्रस्तावांना मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या