कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; श्रीसप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


?feature=share

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथक, पालिका अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिका-यांनी अथक प्रयत्नांनी आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काहींना वाचविण्यात अपयश आले. अद्यापही काही जण ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता असल्याने बचाव मोहीम सुरुच आहे.



या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. इमारत जुनी असल्याची माहिती समोर आली असून त्याची स्थिती लक्षात घेता इतर रहिवाशांचीही काळजी घेतली जात आहे.


दरम्यान श्रीसप्तश्रृंगी इमारत ही धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली होती. प्रशासनाने इमारत रिकामी करण्याचे आदेशही दिले होते. तरी काही कुटुंब तेथे वास्तव्यास होती.

Comments
Add Comment

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)

Monsoon Update : मान्सूनच्या प्रगतीमुळे राज्यात आनंदाचे वातावरण

मुंबई : बहुप्रतिक्षित मान्सूनने अखेर दोन आठवड्यांच्या विलंबानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुढे वाटचाल सुरू

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून