विलंबाने तिकीट घेतल्यास प्रवाशावर कारवाई

'पीएमपी' प्रशासनाचा निर्णय



पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच विलंबाने तिकीट घेणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी मोबाइल ॲप ऑनलाइन तिकीट प्रणाली विकसित केली आहे. या ऑनलाइन ॲपला तांत्रिक अडचण आल्यास किंवा सुट्ट्या पैशांवरून वाद टाळण्यासाठी अत्याधुनिक ई-मशीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांनी बस थांब्यावरून बसमध्ये बसतानाच तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन ‘पीएमपी’ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ‘जीवनवाहिनी’ असलेल्या पीएमपीला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद असतानाही २०२४-२५ या आर्थिक वर्षात संचलन तूट ७६६ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गांचा विस्तार, नवीन मार्गांवर बसचे संचलन, तसेच ऑनलाइन तिकिटासाठी ऑनलाइन ई-मशीन, ॲप आणि इतर सेवांमधील त्रुटी दूर करून नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.



प्रवाशांनी बसलेल्या बसथांब्यावरून त्वरित तिकीट घेणे अनिवार्य करण्यात आले असून, ऑनलाइन तिकीट घेताना नेटवर्कमुळे तिकीट वितरित होण्यास विलंब होत असल्यास वाहकाकडून ई-मशिनद्वारे रोखीने तिकीट घ्यावे. जे प्रवासी तिकीट वेळेत घेणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pune – Sugar Factories : पुणे - साखर कारखान्यांकडे ४८९८ कोटी एफआरपी थकीत

पुणे : यंदाचा २०२५ -२६ चा ऊस गाळप हंगाम आता जवळपास संपला असून मोजकेच १० ते १२ कारखाने अद्याप सुरु आहेत. तरीसुध्दा

SBL Energy Blast : कंपनीचे मालक अजूनही ‘आऊट ऑफ रिच’

महिनाभरात तब्बल २६ कामगारांचा तडफडून मृत्यू नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी १ व ३ एप्रिल रोजी येलो तर २ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यासाठी दिनांक १ व ३ एप्रिल

Dadar-Bhusaval Express : खान्देशी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दादर–भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार

मुंबई : जळगावसह खान्देशातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून विशेष

महाराष्ट्र मत्स्य निर्यातीत देशात 'नंबर २'; कोकणच्या कोळंबीचा रुबाब सातासमुद्रापार!

मुंबई : भारताच्या नीलक्रांतीमध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, मत्स्य

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे