आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: संपूर्ण राज्यात आजपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. १९ ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.


विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल. याआधी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते. आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज, डाक्युमेंट अपलोड, गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी, आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.


प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४) आणि support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.



प्रथम प्राधान्य क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक


विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील. जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली, तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. जर प्रवेश घेतला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही. त्यांना फक्त 'सर्वांसाठी खुली फेरी' या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.

Comments
Add Comment

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याची मंत्रालयात रंगीत तालीम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला होणार ध्वजारोहण मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या

Uday Samant : चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी १६ ऑगस्टला प्रत्यक्ष बैठक घेणार; मंत्री उदय सामंत

मुंबई : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध

Independence Day 2026 : महाराष्ट्रात स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष! जाणून घ्या मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत कुठे कोण फडकवणार तिरंगा?

मुंबई : भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.