Rain Radar : आता अतिवृष्टीचा अंदाज पाच तास आधी मिळणार!

मुंबईत २६ जुलै २००५ ची अतिवृष्टीची रात्र आठवली की काळजाचा ठोका चुकतो. या दिवशी प्रचंड पाऊस झाल्यानं मुंबई शहर पाण्याखाली गेलं होतं. मुंबईत या आधी आणि नंतरही अनेक अतिवृष्टीच्या घटना घडल्या. मात्र २००५ मधली अतिवृष्टीवेळी मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि मृत्यूचे तांडव मुंबईकरांनी पाहिले. हे भयंकर होतं. त्यामुळं संपूर्ण शहर जलमय झालं होतं. यात १५०० नागरिकांचा बळी गेला. अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून अंदाज लवकर मिळाला तर प्रशासनाला वेळीच उपाय करता येणं शक्य होतं. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवून किंवा अलर्ट करून जीवित हानी टाळता येऊ शकते. हेच आता रडारमुळं शक्य होणार आहे. कारण मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी अतिवृष्टीचा अंदाज आपल्याला मिळू शकणार आहे.



मुंबई, पुणे तसेच कोकण भागात होणाऱ्या अतिवृष्टीचा अंदाज येण्यास अनेक अडचणी होत्या. त्या यंदाच्या मान्सून हंगामापासून कमी होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबईतील पनवेल, वसई-विरार, विलेपार्ले आणि कल्याण- डोंबिवली या भागात चार एक्स बॅन्ड रडार बसवले आहेत. ही सर्व रडार मुंबई जलमय होण्याच्या किमान पाच ते सहा तास आधी हा अंदाज देऊ शकतील. काही प्रमाणात पुणे आणि कोकणातील काही भाग हे या रडारच्या कक्षेत असतील. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) मुंबईत एक्स- बँड रडार नेटवर्क स्थापित केली आहेत. त्यामुळं जोरदार पावसाचा अंदाज लवकर मिळण्याची सोय झाली आहे. मुंबईतील १३८ स्टेशनवरचा पाऊस हे रडार नोंदवतील. त्याचा फायदा पुणे शहरासह कोकण विभागाला काही प्रमाणात होईल, असं सांगितलं जातय.



कुठे आहेत हे चार रडार?



  • पनवेल

  • वसई- विरार

  • विलेपार्ले

  • कल्याण- डोंबिवली



कसे काम करणार?


प्रत्येक रडारमधील डेटा एकत्रित केला जाईल, ज्यामुळं मुंबईतील हवामान प्रणालींचा रिअल-टाइम ट्रॅकिंग होईल. मुंबईच्या हवामानाचे बदल आणि त्याचं सततचे रिडिंग मिळेल. रडार नेटवर्क असलेल्या भागात पावसाचं निरीक्षण करेल. त्यानुसार अतिवृष्टीचा अंदाज देणं सोप होणार आहे. मुसळधार पाऊस, वादळ, विजांचा कडकडाट कधी होईल हेही समजण्यास सोपे होईल.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत