नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑगस्ट महिन्यात सुरू होणार






नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आता ऑगस्ट २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा पावसाळी अधिवेशन काळात होण्याची शक्यता आहे.






आधीच्या नियोजनानुसार विमानतळाचे उद्घाटन १५ मे २०२५ पर्यंत होणार होते. पण विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत काही अडथळे अद्याप आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन अर्थात नोटॅम जारी करुन किमान ६ ऑगस्ट २०२५ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टेक-ऑफ, लँडिंग, आपत्कालीन वापरासाठी अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे.

विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत ८६ निवासी इमारती, जवळच्या टेकड्यांवरील ७९ उंच बांधकामं, विजेच्या उच्च दाबाच्या तारांसाठी उभारलेले २३ खांब, १२ मोबाईल टॉवर, स्टेडियमचे आठ फ्लड लाईट, चार विजेचे खांब, तीन ओद्योगिक धुरांडी, औद्योगिक कामांसाठी उंचावर कार्यरत असलेल्या तीन क्रेन यांचा अडथळा आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार ३० जून २०२५ पासून होणार आहे. याआधी ३ मार्च २०२५ ते २७ मार्च २०२५ दरम्यान सुटीचे दिवस वगळून सोळा दिवस विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात १० मार्च २०२५ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. या अधिवेशनानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिमाखात उद्घाटन होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई