पार्किंगची सोय नसेल, तर गाडीही नको! राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार!

मुंबई : राज्यात खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना, पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात नवी पार्किंग पॉलिसी लागू केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


राज्यातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) परिसरात पार्किंगसाठी जागांचा तुटवडा गंभीर असून, या भागात प्रथम ही पॉलिसी राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही अशी भूमिका घेतली आहे की, ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल, त्यालाच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल," असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.



ते पुढे म्हणाले, “अनेक देशांमध्ये पार्किंग पॉलिसी सक्तीची आहे, परंतु आपल्या देशात ती अद्याप अस्तित्वात नाही. त्यामुळे या पॉलिसीची सुरुवात एमएमआरपासून करून, पुढे ती संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.”


या बैठकीत परिवहन विभागातील अंतर्गत बदल्यांवरही चर्चा झाली. सरनाईक म्हणाले, “बदल्या मी ऑनलाईन बटन दाबून केल्या आहेत. यामध्ये प्रेग्नंट महिलांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”


तसेच, एमएमआर भागात पॉड टॅक्सी प्रकल्पासाठीही विभाग आग्रही आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हिरवा कंदील मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण