पार्किंगची सोय नसेल, तर गाडीही नको! राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार!

मुंबई : राज्यात खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना, पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात नवी पार्किंग पॉलिसी लागू केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


राज्यातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) परिसरात पार्किंगसाठी जागांचा तुटवडा गंभीर असून, या भागात प्रथम ही पॉलिसी राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही अशी भूमिका घेतली आहे की, ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल, त्यालाच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल," असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.



ते पुढे म्हणाले, “अनेक देशांमध्ये पार्किंग पॉलिसी सक्तीची आहे, परंतु आपल्या देशात ती अद्याप अस्तित्वात नाही. त्यामुळे या पॉलिसीची सुरुवात एमएमआरपासून करून, पुढे ती संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.”


या बैठकीत परिवहन विभागातील अंतर्गत बदल्यांवरही चर्चा झाली. सरनाईक म्हणाले, “बदल्या मी ऑनलाईन बटन दाबून केल्या आहेत. यामध्ये प्रेग्नंट महिलांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”


तसेच, एमएमआर भागात पॉड टॅक्सी प्रकल्पासाठीही विभाग आग्रही आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हिरवा कंदील मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला