पार्किंगची सोय नसेल, तर गाडीही नको! राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार!

मुंबई : राज्यात खाजगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असताना, पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले असून, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात नवी पार्किंग पॉलिसी लागू केली जाणार आहे. ही माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.


राज्यातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) परिसरात पार्किंगसाठी जागांचा तुटवडा गंभीर असून, या भागात प्रथम ही पॉलिसी राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. "आम्ही अशी भूमिका घेतली आहे की, ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल, त्यालाच वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येईल," असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.



ते पुढे म्हणाले, “अनेक देशांमध्ये पार्किंग पॉलिसी सक्तीची आहे, परंतु आपल्या देशात ती अद्याप अस्तित्वात नाही. त्यामुळे या पॉलिसीची सुरुवात एमएमआरपासून करून, पुढे ती संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.”


या बैठकीत परिवहन विभागातील अंतर्गत बदल्यांवरही चर्चा झाली. सरनाईक म्हणाले, “बदल्या मी ऑनलाईन बटन दाबून केल्या आहेत. यामध्ये प्रेग्नंट महिलांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल.”


तसेच, एमएमआर भागात पॉड टॅक्सी प्रकल्पासाठीही विभाग आग्रही आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हिरवा कंदील मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते