मुंबई इंडियन्सची टीम प्ले ऑफसाठी कशी पात्र ठरणार ?

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये ७० साखळी सामने होणार आहेत. यापैकी साठ सामने झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे तीन संघ आयपीएलच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होण्याकरिता दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे.

मुंबई इंडियन्सचे अजून दोन साखळी सामने व्हायचे आहेत. यापैकी एक सामना २१ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना २६ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला दिल्ली आणि पंजाब या दोन संघांविरुद्ध प्रत्येकी एक साखळी सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम आरामात पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होणार आहे. पण यातील एखादा सामना मुंबईने गमावल्यास जर - तरच्या गणिताला सुरुवात होणार आहे.

तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ संघाला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत. दिल्लीचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल.

गुजरात टायटन्सने २२ मे रोजी लखनऊ आणि २५ मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते टॉप टू मध्ये कायम राहतील आणि २९ मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने एक सामना गमावला तसेच पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित साखळी सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप टू मध्ये असण्यावर परिणाम करतील.
Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या