मुंबई इंडियन्सची टीम प्ले ऑफसाठी कशी पात्र ठरणार ?

मुंबई : आयपीएल २०२५ मध्ये ७० साखळी सामने होणार आहेत. यापैकी साठ सामने झाले आहेत. गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे तीन संघ आयपीएलच्या पुढील फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होण्याकरिता दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे.

मुंबई इंडियन्सचे अजून दोन साखळी सामने व्हायचे आहेत. यापैकी एक सामना २१ मे रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना २६ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला दिल्ली आणि पंजाब या दोन संघांविरुद्ध प्रत्येकी एक साखळी सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम आरामात पुढील फेरीसाठी चौथा संघ म्हणून पात्र होणार आहे. पण यातील एखादा सामना मुंबईने गमावल्यास जर - तरच्या गणिताला सुरुवात होणार आहे.

तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ संघाला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत. दिल्लीचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल.

गुजरात टायटन्सने २२ मे रोजी लखनऊ आणि २५ मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकल्यास ते टॉप टू मध्ये कायम राहतील आणि २९ मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने एक सामना गमावला तसेच पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित साखळी सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप टू मध्ये असण्यावर परिणाम करतील.
Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस