Pakistani Spy: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ज्योती मल्होत्रानंतर हरियाणातून आणखीन एकाला अटक, अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा

हरियाणाच्या नूहमध्ये पाकिस्तानी 'गुप्तचर' नेटवर्कचा पर्दाफाश, दोन दिवसांत दुसरी अटक


चंदीगड: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात हरियाणातील हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केल्यानंतर, पोलिसांनी केलेल्या कारवाईत आणखी काही लोकांच देखील चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये हरियाणाच्या नूह जिल्ह्यातून दोन संशयित हेरांना अटक केली आहे. त्यामध्ये मोहम्मद तारिफ या नावाचा मुख्य  गुप्तहेर असून, त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर नेटवर्कसाठी काम केल्याची कबुली दिली आहे.


तारिफ, नूह जिल्ह्यातील तावाडू येथील कांगारका गावचा रहिवासी असून, सुरुवातीला पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना सिम कार्ड पुरवण्याचे काम करत होता. पुढे त्याच अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, त्याने भारतीय लष्करी ठिकाणांबाबत संवेदनशील माहिती पुरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवली, आणि नंतर ती तंत्रज्ञान वापरून डिलीटही केली गेली.


तारिफच्या जबाबानुसार, त्याचा पहिला संपर्क पाकिस्तानच्या दिल्लीतील दूतावासातील अधिकारी आसिफ बलोचशी झाला होता. बलोचच्या माध्यमातून त्याने पाकिस्तानातही प्रवास केला. परत आल्यावर त्याला अशा लोकांना पाकिस्तानात पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली, ज्यांना पाकिस्तानी व्हिसाची गरज होती. यासाठी त्याला पैसे देखील दिले जात होते. २०२४ मध्ये आसिफ बलोचची बदली झाल्यानंतर तारिफचा संपर्क दुसरा पाकिस्तानी अधिकारी जाफरशी झाला. जाफरने तारिफला सिरसा येथील हवाई दल तळावर नजर ठेवण्याचे आणि तिथली गोपनीय माहिती मिळवण्याचे काम दिले. गेल्या दीड वर्षांपासून तारिफने मोठ्या प्रमाणात माहिती पाकिस्तानला पाठवली असल्याचे पोलीस तपासांत स्पष्ट झाले आहे.


तारिफचा विवाह दिल्लीतील चंदनहोला येथे झाला होता आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. या परिसरात तो एक ढोंगी डॉक्टर म्हणूनही ओळखला जात होता. अंसल फार्म हाऊसजवळ त्याने एक छोटंसं क्लिनिक उघडलं होतं, ज्याचा वापर केवळ सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी केला जात होता. आता हरियाणा पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून, पाकिस्तानशी संबंधित हेरगिरीच्या नेटवर्कचा तपास वाढवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर