Terrorist Killed: भारताचा आणखी एक मोठा शत्रू मारला गेला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद ठार

  145

नवी दिल्ली: भारतात अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी हल्ल्यांचा कट रचल्याचा आरोप असलेला लष्कर-ए-तैयबा (LET) चा कुख्यात दहशतवादी सैफुल्ला खालिद पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मारला गेला आहे. रविवारी सूत्रांनी ही माहिती दिली. त्याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. २००१ मध्ये रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, २००५ मध्ये बंगळुरूमधील इंडियन सायन्स काँग्रेस (ISC) वर हल्ला आणि २००६ मध्ये नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर हल्ला या तीन मोठ्या हल्ल्यांमध्ये खालिद प्रमुख सूत्रधार होता.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली तालुक्यात त्याला ठार करण्यात आले. हा दहशतवादयांचा नेता लष्करच्या दहशतवाद्यांना नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करण्यास मदत करत असे. त्यामुळे भारतीय भूमीवर लष्कर-ए-तैयबाच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती.



कोण होता सैफुल्ला खालिद?


सैफुल्लाह भारताविरुद्ध अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.  सैफुल्ला उर्फ ​​विनोद कुमार उर्फ ​​मोहम्मद सलीम उर्फ ​​खालिद उर्फ ​​वनियाल उर्फ ​​वाजिद उर्फ ​​सलीम भाई अशी त्याची अनेक नावं आहेत. सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या संपूर्ण दहशतवादी मॉड्यूलचे व्यवस्थापन करत असे. सैफुल्लाहचे मुख्य काम लष्कराच्या दहशतवादी कारवायांसाठी कॅडर आणि आर्थिक मदत पुरवणे होते. सैफुल्लाने एका नेपाळी नागरिक महिलेशी लग्न देखील केले होते. तो लष्कर आणि जमात उद दावासाठी भरती आणि निधी संकलनाचे काम करायचा. अलिकडेच त्याने पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बदिन जिल्ह्यातील माटली येथे आपले लपण्याचे ठिकाण बनवले होते. तिथून, तो लष्कर-ए-तैयबा, संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला पाकिस्तानी दहशतवादी गट आणि त्याची आघाडीची संघटना जमात-उद-दावासाठी काम करत होता. या संघटनांचा उद्देश दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे आणि निधी उभारणे हा आहे.


Comments
Add Comment

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन

Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान