IIT Bombay Boycott Turkey: आता आयआयटी मुंबईने टाकला तुर्कीवर बहिष्कार, विद्यापीठांसोबतचा सामंजस्य करार रद्द

मुंबई: भारतात तुर्कीविरुद्ध निदर्शनाची मालिका सुरूच आहेत. देशात प्रत्येक तुर्की वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. तुर्कीला भारतातून संगमरवरी आणि सफरचंदांचा व्यापार थांबवण्याच्या घोषणेनंतर, देशातील अनेक मोठ्या संस्थांनीही तुर्कीसोबतचे त्यांचे करार रद्द केले आहेत. या यादीत आयआयटी मुंबई (IIT Bombay) देखील सामील झाले आहे. आयआयटी मुंबईनेही तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले आहेत.


तुर्की आणि भारत यांच्यातील सध्याची भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटी मुंबईने म्हटले आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत तुर्कीसोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित राहील.



तुर्कीसोबतचे शैक्षणिक सहकार्य स्थगित 


आयआयटी मुंबईने विद्यार्थी आणि प्राध्यापकांना तुर्कीशी संबंधित कोणत्याही देवाणघेवाण किंवा संशोधन कार्यक्रमांबाबत अधिकृत माहितीला स्थगिती देण्यास सांगितले आहे. यापूर्वी आयआयटी रुरकी, जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया सारख्या संस्थांनीही तुर्की संस्थांसोबतचे सहकार्य संपवले आहे. देशाच्या सुरक्षेला आणि हितांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयआयटी मुंबईच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तुर्कीवर पाकिस्तानला लष्करी मदत केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे भारतभर त्याविरुद्ध निदर्शने होत असून,  या पार्श्वभूमीवर "बहिष्कार तुर्किए" (Boycott Turkey) मोहिम देशभरात राबवली जात आहे.



जेएनयू, (JNU), जामिया आणि आयआयटी रुरकी यांनीही सामंजस्य करार केला रद्द 


जेएनयूने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार (MoU) स्थगित केला आहे. त्याच वेळी, जामिया मिलिया इस्लामियानेही राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत तुर्की संस्थांसोबतचे सर्व प्रकारचे सहकार्य थांबवण्याची घोषणा केली आहे. तसेच आयआयटी रुरकीने तुर्कीतील इनोनू विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार औपचारिकपणे रद्द केला आहे.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ