राम मंदिरातील २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

अयोध्या : मागील काही महिन्यांमध्ये लाखो भाविकांच्या ओघामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली होती.मात्र, आता गर्दीचा ओघ कमी झाल्याने मंदिर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेने या व्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली असून २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे.

महाकुंभमेळ्याच्या काळात एसआयएस या खाजगी सुरक्षा एजन्सीतर्फे सुमारे ४५० सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. मात्र, आता मिळालेल्या माहितीनुसार, एसआयएसने तब्बल २५० पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, त्यांचे प्रवेश पासही रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात अतिशय संवेदनशील जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही यात समावेश आहे.


या मागचं कारण गर्दी आणि उत्पन्नात घट ही एक बाजू असली, तरी काही कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन, शिस्तभंग आणि दर्शन-आरती पासांच्या नावाखाली अनधिकृत वसुलीचे गंभीर आरोपही असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता मंदिराच्या सुरक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, रामजन्मभूमीची प्रतिमा डागाळल्याची भावना काहींनी व्यक्त केली आहे. मात्र, मंदिर प्रशासन या संपूर्ण घडामोडींवर बोलण्यास टाळाटाळ करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही नियुक्ती व सेवा समाप्ती ही एजन्सी आणि संबंधित संस्थांमधील अंतर्गत बाब असून, मंदिर ट्रस्ट यामध्ये थेट सहभागी नाही. सध्या राम मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था पुन्हा संतुलित केली जात असून, उरलेल्या रक्षकांवर अधिक जबाबदारी पडली आहे. मात्र, ज्यांची उपजीविका या नोकऱ्यांवर अवलंबून होती, अशा कुटुंबांसाठी ही अचानक झालेली कपात मोठा आर्थिक धक्का ठरत आहे.

Comments
Add Comment

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल