Mud Pot Water : युग रेफ्रिजरेटरचं, अन् क्रेझ माठाची!

तहान भागवणारा, आरोग्य जपणारा माठ आहे गुणकारी


आधीच उन्हाळा, त्यात अवकाळी. त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झालीय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. घसा कोरडा पडतोय. अशा कोरड्या घशाला थंड पाणी प्यायला मिळाले तर...तर मग सोन्याहून पिवळंच की. आजकाल सर्वांकडे रेफ्रिजरेटर असतात, तरीही माठातलं पाणी पिण्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. मातीच्या भांड्यातील पाण्याचा नेमका काय होतो फायदा आणि माठातील पाणी पिण्याची क्रेझ का वाढतेय, जाणून घेऊया या लेखातून...

ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिणं कुणाला आवडणार नाही? फ्रिजमधील थंड पाणी पिऊन तहान शांत केली जाते. त्यातच सर्वांकडे फ्रिज असल्यामुळे थंड पाणी सहज उपलब्ध असतं. असं असलं तरी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची क्रेझ वाढतेय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी आहे आणि माठातील पाणी प्यायल्याने समाधानही मिळतं. भारतात माठातील पाणी पिण्याची परंपरा पूर्वापार आहे. माठातील पाणी सहज पचतं. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. जर्नल ऑफ इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनने त्याचं महत्त्व स्पष्ट केलंय. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यांमधील साठवलेलं पाणी हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतं असं नमूद करण्यात आलंय.


चला तर मग आता पाहूयात मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे



  • उष्माघातापासून संरक्षण करणं

  • हायड्रेशन वाढवणं

  • शरीर डीटॉक्स करणं

  • पचन सुधारणं

  • प्लास्टिकच्या विषापासून दूर ठेवणं

  • शरीराचं तापमान संतुलित ठेवणं

  • असिडिटी आणि गॅस न होणं


आता पाहूयात मातीच्या भांड्यामध्ये पाणी कसं थंड होतं ते. मातीची भांडी अथवा माठ यांना छिद्रं असतात. या छिद्रांतून पाणी भांड्याच्या बाहेर झिरपतं. त्यानंतर त्याच्या बाष्पी भवनाला सुरुवात होते. त्यानंतर पाणी हळूहळू थंड होण्यास सुरुवात होते. त्याचरोबर मातीच्या भांड्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे खनिजे पाण्यात विरघळतात. पाण्याचं भांड किंवा माठ नवीन असेल तर जवळपास १२ तास भिजत ठेवणं महत्त्वाचं असतं. हे सर्व करताना मातीची भांडी स्वच्छ कशी ठेवावीत हेही पाहूयात...


कशी ठेवाल मातीची भाडी सुरक्षित ?


भांडं सावलीच्या ठिकाणी ठेवा, बॅक्टेरिया वाढू नयेत यासाठी नियमित स्वच्छ करा, दररोज शिळे पाणी बदला आणि ताजे भरा, भांडं स्वच्छ करताना साबणाचा वापर टाळा, मातीचं भांडं फ्रिजमधील थंड पाण्याने भरू नका. तुम्हाला तहान भागवायची असेल आणि आरोग्यही जपायचं असेल तर मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिणं गरजेचं आहे. कारण मातीच्या भांड्यातून आपल्याला नैसर्गिक थंडावा मिळत असतो. त्यामुळे आधुनिक युग फ्रिजचं असलं तरी माठाची क्रेज कमी झालेली नाही.
Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या