वाडा पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर

  45

लाच घेताना पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकास पकडले रंगेहाथ


वाडा : वाडा पंचायत समिती वाडा पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक सुशील कटारे याला विहीरीसाठी ५ लाखांचा निधी मंजूर करण्यासाठी ५ हजारांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक केली. या प्रकाराने पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.


यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीकरिता ५ लाखांचा निधी मंजूर करणेकरिता पंचायत समिती वाडा यांच्याकडे अर्ज केला होता. ही विहीर मंजूर करण्यासाठी तांत्रिक सहाय्यक व वरिष्ठांसाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली त्याआनुषंगाने (दि १५ मे रोजी) तक्रारदार यांना त्यांचे तक्रारी प्रमाणे पंचासमक्ष पडताळणी करिता पाठवले असता स्वत:साठी ५ हजार रुपये व वरिष्ठासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी केली; परंतु तक्रारदार यांच्याकडे ५ हजार रुपये असल्याचे लोकसेवक कटारे यांना तक्रारदार यांनी सांगितल्याने सदरची रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर ५ हजार रुपयांची लाच कटारे यांना स्वीकारल्याने त्याना रंगेहाथ पकडून अटक केली. कटारे यांच्याकडून मोबाइल घेण्यात आला असून पुढील निरीक्षण करून तपास करण्यात येत आहे. ही कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक अभिजित पवार, पोलीस हवालदार सुमडा, योगेश धारणे याच्या पथकाने केली.


दरम्यान, वाडा पंचायत समितीत टक्केवारी घेतल्याशिवाय कामच होत नाही. अनेक फाईली वरिष्ठाच्या टेबलावर महिनोंमहिने पडून असून पैशाशिवाय कामच होत नसल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे हे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले असून महिनोमहिने फाईल का पडून आहेत याची खातरजमा केल्यास हे सर्व उघड होईल.

Comments
Add Comment

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८