Nandgoan : नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू; सहा गंभीर जखमी

  60

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH ०२ E E २३०९) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH ४१ A U ५३१६) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या. या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथोमापचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.



या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५०(B), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहे.

Comments
Add Comment

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग

आरसीबीच्या मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक

बंगळूरु चेंगराचेंगरी प्रकरणी बंगळूरु: बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी

पंतप्रधान मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाकडून जी-७ संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. कॅनडाचे

Indus Water Treaty: पाकिस्तानची भारताला पाणी देण्याची विनंती; चार वेळा पाठवले पत्र

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारताला चार वेळा पत्र लिहून सिंधू पाणी करार (IWT) स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार