Nandgoan : नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू; सहा गंभीर जखमी

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील पोखरी शिवारात एका खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इर्टीगा कार व मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात होऊन यात निफाड तालुक्यातील ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदगाव मध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलवण्यात आले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून येणाऱ्या काळ्या रंगाची इर्टीगा कार क्रमांक (MH ०२ E E २३०९) ही गाडी येत असताना नांदगाव कडून कासारी कडे जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पो क्रमांक (MH ४१ A U ५३१६) ला जोरदार धडक दिली. या टेम्पोमध्ये सिमेंटच्या गोण्या भरलेल्या होत्या. या अपघातात इर्टीगा कारचा चालक वैभव वाल्मीक वैताळ (रा. निफाड) यांच्यासह अजून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळीच तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथोमापचार करून पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.



या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३३/२०२५ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५०(B), तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर करत आहे.

Comments
Add Comment

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर

कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय