बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा; किनारपट्टी भाग सतर्क

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ या चक्रीवादळाच्या निर्माणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १६ ते १८ मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. हे वादळ २३ ते २८ मेच्या दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल व बांगलादेशाच्या किनारपट्टी भागांना धडकू शकते.


हवामान खात्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण पूर्व किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


या संभाव्य वादळामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्रात उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान खात्याच्या अधिकृत माहितीवर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन