Rajnath Singh: 'त्यांनी धर्म पाहून मारले, आणि आपण त्यांचे कर्म पाहून मारले...', श्रीनगरमध्ये राजनाथ सिंह यांची गर्जना

श्रीनगर: पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी श्रीनगर येथील चिनार कॉर्प्समध्ये भेट दिली. यादरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांत प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच  सुरक्षा परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.


यादरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले, "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची  हत्या केली आणि आपण  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या कर्मामुळे मारले." त्यानंतर ते पुढे म्हणाले,  "मी संपूर्ण जगाला विचारू इच्छितो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहे?" असा सवाल देखील त्यांनी केला.



सैनिकांचे मनोबल वाढवले


राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते म्हणाले, "तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही. लोकं सहसा उत्साहाच्या भरात आपले भान हरपून काहीही करतात, पण तुम्ही तुमचा उत्साह आणि संयम कायम राखत शत्रूचे लपलेले ठिकाण अचूक नष्ट केले.


२२ एप्रिल रोजी पहलगांम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे. त्यामुळे एक संरक्षक मंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आणि सैनिकांशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे होते.




Comments
Add Comment

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे.

जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या

History of Death Penalty : भारतात फाशी देण्यात आलेली एकमेव महिला कोण? सिया गोयल प्रकरणानंतर पुन्हा इतिहास चर्चेत

नवी दिल्ली : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Murder Case) मुख्य आरोपी सिया गोयलला फाशीची

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून