Rajnath Singh: 'त्यांनी धर्म पाहून मारले, आणि आपण त्यांचे कर्म पाहून मारले...', श्रीनगरमध्ये राजनाथ सिंह यांची गर्जना

श्रीनगर: पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी श्रीनगर येथील चिनार कॉर्प्समध्ये भेट दिली. यादरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांत प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच  सुरक्षा परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.


यादरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले, "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची  हत्या केली आणि आपण  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या कर्मामुळे मारले." त्यानंतर ते पुढे म्हणाले,  "मी संपूर्ण जगाला विचारू इच्छितो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहे?" असा सवाल देखील त्यांनी केला.



सैनिकांचे मनोबल वाढवले


राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते म्हणाले, "तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही. लोकं सहसा उत्साहाच्या भरात आपले भान हरपून काहीही करतात, पण तुम्ही तुमचा उत्साह आणि संयम कायम राखत शत्रूचे लपलेले ठिकाण अचूक नष्ट केले.


२२ एप्रिल रोजी पहलगांम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे. त्यामुळे एक संरक्षक मंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आणि सैनिकांशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे होते.




Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या