Rajnath Singh: 'त्यांनी धर्म पाहून मारले, आणि आपण त्यांचे कर्म पाहून मारले...', श्रीनगरमध्ये राजनाथ सिंह यांची गर्जना

श्रीनगर: पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी श्रीनगर येथील चिनार कॉर्प्समध्ये भेट दिली. यादरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांत प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच  सुरक्षा परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.


यादरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले, "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची  हत्या केली आणि आपण  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या कर्मामुळे मारले." त्यानंतर ते पुढे म्हणाले,  "मी संपूर्ण जगाला विचारू इच्छितो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहे?" असा सवाल देखील त्यांनी केला.



सैनिकांचे मनोबल वाढवले


राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते म्हणाले, "तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही. लोकं सहसा उत्साहाच्या भरात आपले भान हरपून काहीही करतात, पण तुम्ही तुमचा उत्साह आणि संयम कायम राखत शत्रूचे लपलेले ठिकाण अचूक नष्ट केले.


२२ एप्रिल रोजी पहलगांम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे. त्यामुळे एक संरक्षक मंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आणि सैनिकांशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे होते.




Comments
Add Comment

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,