Rajnath Singh: 'त्यांनी धर्म पाहून मारले, आणि आपण त्यांचे कर्म पाहून मारले...', श्रीनगरमध्ये राजनाथ सिंह यांची गर्जना

श्रीनगर: पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आणि सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी श्रीनगर येथील चिनार कॉर्प्समध्ये भेट दिली. यादरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांत प्रभारी असलेल्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच  सुरक्षा परिस्थितीवर देखील चर्चा करण्यात आली.


यादरम्यान केलेल्या भाषणात ते म्हणाले, "पहलगाममध्ये त्यांनी धर्म विचारून निष्पाप लोकांची  हत्या केली आणि आपण  दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या कर्मामुळे मारले." त्यानंतर ते पुढे म्हणाले,  "मी संपूर्ण जगाला विचारू इच्छितो की अशा बेजबाबदार आणि दुष्ट राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहे?" असा सवाल देखील त्यांनी केला.



सैनिकांचे मनोबल वाढवले


राजनाथ सिंह यांनी भारतीय सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल देखील वाढवले. ते म्हणाले, "तुम्ही सीमेपलीकडे पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर ज्या प्रकारे उद्ध्वस्त केले ते शत्रू कधीच विसरू शकणार नाही. लोकं सहसा उत्साहाच्या भरात आपले भान हरपून काहीही करतात, पण तुम्ही तुमचा उत्साह आणि संयम कायम राखत शत्रूचे लपलेले ठिकाण अचूक नष्ट केले.


२२ एप्रिल रोजी पहलगांम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर १० मे रोजी दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीनंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे. त्यामुळे एक संरक्षक मंत्री म्हणून त्यांचा हा दौरा आणि सैनिकांशी संवाद साधणे अत्यंत महत्वाचे होते.




Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था