पाण्यासाठी पाकिस्तान रडकुंडीला

पाकच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताला पाठवले पत्र


नवी दिल्ली/ इस्लामाबाद : भारताच्या लष्करी कारवाईमुळे दबावाखाली आलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताकडे सिंधू पाणी वाटप करार पुन्हा सुरू करण्याची विनंती केली आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला होता.


पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाचे सचिव सय्यद अली मुर्तजा यांनी भारताच्या जल शक्ती मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून, भारताने घेतलेला निर्णय पुनर्विचारात करावा, अशी मागणी केली आहे. या पत्रात पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पाण्याविना पाकिस्तानातील शेती सुकण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच आता पाकिस्तान भारताकडे पाण्यासाठी गयावया करत आहे. दरम्यान, भारताने बगलिहार आणि सलाल धरणांतून पाणी रोखले आहे.


ऑपरेशन सिंदूर : भारताचा सर्जिकल प्रहार


७ मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यानंतर चार दिवस दोन्ही देशांमध्ये ड्रोन व लष्करी कारवाया झाल्या. त्यानंतर शस्त्रसंधी झाली असली तरी भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की, सिंधू जलवाटप करार पुढील निर्णय होईपर्यंत स्थगितच राहील. पाण्यासाठी पाकिस्तानची अडवणूक झाली तरच दहशतवादावर तोडगा निघेल, असा सूर देशातील नागरिकांकडून आळविला जात आहे.


भारताचा निर्णायक निर्णय


२३ एप्रिल रोजी झालेल्या सुरक्षा समितीच्या बैठकीत भारत सरकारने सिंधू जलवाटप करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला. १९६० साली स्वाक्षरी झालेल्या या संधीनुसार भारताला सुमारे ३० टक्के आणि पाकिस्तानला उर्वरित ७० टक्के जलप्रवाह वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला देण्यात येणारे पुराचे इशारे थांबवले आहेत.


परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण


भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जयस्वाल यांनी मंगळवारी सांगितले होते, ‘२३ एप्रिलच्या सीसीएस बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, पाकिस्तान जेव्हा क्रॉस-बॉर्डर दहशतवादाला कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे नकार देईल, तेव्हाच संधीबाबत पुढे विचार केला जाईल. शिवाय हवामान बदल, लोकसंख्या वाढ आणि तंत्रज्ञानातील बदलांनी नव्या वास्तवांना जन्म दिला आहे’.

Comments
Add Comment

Iran - America War : होर्मुझ मधून बारूदी सुरुंग काढायला लागू शकतात सहा महिने - अमेरिका

पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान इराणने होर्मुज सामुद्रधुनीत बारूदी सुरुंगांची पेरणी करून हा मार्ग अत्यंत

White House Dinner Firing : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराने खळबळ; मोदींसह जगभरातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया

वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये कॉरेस्पॉन्डेंट्स डिनर दरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जग हादरले आहे.

White House Dinner Firing : ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी केला हल्ला, हल्लेखोराने दिली कबुली

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट्स डिनर’मध्ये गोळीबार झाला.

XChat : लाँच झाले एक्सचे एक्सचॅट ॲप

टेक्सास : एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेसेजिंग ॲप एक्सचॅट लॉन्च केले आहे. सध्या हे ॲप फक्त आयओएस

White House Dinner Firing : व्हाईट हाऊस डिनरदरम्यान गोळीबार! घटनेनंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. (Washington, D.C.) येथील प्रतिष्ठित हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स

Iran - Pakistan Meeting : इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी घेतली पाकिस्तानचे लष्करप्रमुख मुनीर यांची भेट

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची इस्लामाबादमध्ये भेट