पाहिला डोळेभरी

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वराचा विस्तार सतत होत राहिलेला आहे. आपण आपले जग आणि परमेश्वर या सर्वच एकमेकांशी अत्यंत जवळचा आणि घनिष्ट संबंध आहे, पण अशा महत्त्वाचा विषयाचा अभ्यास किंवा इतर समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याऐवजी काही लोक विचित्र समज सर्वसामान्य लोकांत पसरवून दिशाभूल करतात. काही जण म्हणतात जगबुडी होणार. आम्ही स्पष्ट सांगतो आहोत की कुणीही कितीही सांगितले की जगबुडी होणार तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी जगबुडी कधीही होणार नाही आणि जगबुडी झालीच, तर कोण उरणार आहे जग बुडाले हे सांगायला. काही मूर्ख लोक असे सांगतात की, आमचे ते डोंगरावर स्थान आहे तिथे आम्ही सगळे जाऊन राहणार. अरे मूर्खांनो जग बुडाले, तर तो डोंगर बुडणार नाही का? इतकीसुद्धा अक्कल त्या लोकांना नाही.


तो डोंगर कधीही पाण्याखाली जाऊ शकतो.आता मुंबईचे सुद्धा कधी वाळवंट होईल सांगता येत नाही. ती कधीही पाण्याखाली जाऊ शकते. याचे कारण पर्यावरण बिघडत चाललेले आहे.


काही गावे तर पाण्याखाली गेली सुद्धा आहेत. हे सर्व जर आपण पाहिले, तर परमेश्वराच्या शक्तीचा केवळ अंदाज बांधता येतो. मात्र असे असूनही परमेश्वराचे वर्णन जसा आहे तसे, जेवढे आहे तेवढे कोण करू शकेल. कुणीच करू शकत नाही. तो आहे तसा कुणीच सांगू शकत नाही. सत्य म्हणजे त्याचे असणे हे अनंत आहे. त्याचे ज्ञान तेही infinite आहे. आनंद हा ही infinite आहे. गगनाचे प्रावरण म्हणजे त्याला रूप नाही, रंग नाही असा हा डोळेभरी कसा पाहिला.


सत्यज्ञानानंद
गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे
तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया


तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी. तो हा श्रीहरी म्हणजे इथेच पाहिला. बाहेरही पाहिला आणि आतही पाहिला. आत पाहिल्यामुळे तो बाहेर आहे हे दिसू लागले. बाहेरही तोच आहे हे मला दिसायला लागले. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.


“अवघी भुते साम्ये आली देखिली म्या कई होती
विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा
माझी कुणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व
तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी ऐसे’’


सर्व ठिकाणी मीच दिसायला लागलो. आतमध्येही तोच व बाहेरही तोच. बाहेर जो आहे तोच या ठिकाणी मी रूपाने आहे. असे हे सगळे गणित आहे. अध्यात्माचे हे जे गणित आहे ते एका अर्थी समजायला सोपे आहे व एका अर्थी ते समजायला कठीण आहे. समजायला सोपे आहे ते सद्गुरुंचे मार्गदर्शन असेल आणि समजायला कठीण असेल, तर ते सद्गुरुंचे मार्गदर्शन नसेल.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा