पाहिला डोळेभरी

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वराचा विस्तार सतत होत राहिलेला आहे. आपण आपले जग आणि परमेश्वर या सर्वच एकमेकांशी अत्यंत जवळचा आणि घनिष्ट संबंध आहे, पण अशा महत्त्वाचा विषयाचा अभ्यास किंवा इतर समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याऐवजी काही लोक विचित्र समज सर्वसामान्य लोकांत पसरवून दिशाभूल करतात. काही जण म्हणतात जगबुडी होणार. आम्ही स्पष्ट सांगतो आहोत की कुणीही कितीही सांगितले की जगबुडी होणार तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी जगबुडी कधीही होणार नाही आणि जगबुडी झालीच, तर कोण उरणार आहे जग बुडाले हे सांगायला. काही मूर्ख लोक असे सांगतात की, आमचे ते डोंगरावर स्थान आहे तिथे आम्ही सगळे जाऊन राहणार. अरे मूर्खांनो जग बुडाले, तर तो डोंगर बुडणार नाही का? इतकीसुद्धा अक्कल त्या लोकांना नाही.


तो डोंगर कधीही पाण्याखाली जाऊ शकतो.आता मुंबईचे सुद्धा कधी वाळवंट होईल सांगता येत नाही. ती कधीही पाण्याखाली जाऊ शकते. याचे कारण पर्यावरण बिघडत चाललेले आहे.


काही गावे तर पाण्याखाली गेली सुद्धा आहेत. हे सर्व जर आपण पाहिले, तर परमेश्वराच्या शक्तीचा केवळ अंदाज बांधता येतो. मात्र असे असूनही परमेश्वराचे वर्णन जसा आहे तसे, जेवढे आहे तेवढे कोण करू शकेल. कुणीच करू शकत नाही. तो आहे तसा कुणीच सांगू शकत नाही. सत्य म्हणजे त्याचे असणे हे अनंत आहे. त्याचे ज्ञान तेही infinite आहे. आनंद हा ही infinite आहे. गगनाचे प्रावरण म्हणजे त्याला रूप नाही, रंग नाही असा हा डोळेभरी कसा पाहिला.


सत्यज्ञानानंद
गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे
तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया


तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी. तो हा श्रीहरी म्हणजे इथेच पाहिला. बाहेरही पाहिला आणि आतही पाहिला. आत पाहिल्यामुळे तो बाहेर आहे हे दिसू लागले. बाहेरही तोच आहे हे मला दिसायला लागले. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.


“अवघी भुते साम्ये आली देखिली म्या कई होती
विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा
माझी कुणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व
तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी ऐसे’’


सर्व ठिकाणी मीच दिसायला लागलो. आतमध्येही तोच व बाहेरही तोच. बाहेर जो आहे तोच या ठिकाणी मी रूपाने आहे. असे हे सगळे गणित आहे. अध्यात्माचे हे जे गणित आहे ते एका अर्थी समजायला सोपे आहे व एका अर्थी ते समजायला कठीण आहे. समजायला सोपे आहे ते सद्गुरुंचे मार्गदर्शन असेल आणि समजायला कठीण असेल, तर ते सद्गुरुंचे मार्गदर्शन नसेल.

Comments
Add Comment

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

पितृऋण

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे हिंदू धर्माने सांगितलेली चार ऋणे म्हणजेच देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण.