महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २८ टक्के पाणीसाठा

  89

मुंबई : उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सर्वाधिक ३८.१३ टक्के पाणीसाठा अमरावती येथील धरणांत आहे.कोकणातील धरणांमध्ये ३४.१५ टक्के, नागपूर येथील धरणांमध्ये ३२.७९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये ३१.२३ टक्के, नाशिकच्या धरणांमध्ये ३१.३५ टक्के तर पुण्यातील धरणांमध्ये २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये १४,२५३.३६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यापैकी ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.


नागपूर येथील धरणांमध्ये ११३५.४ दशलक्ष घनमीटर, अमरावतीच्या धरणांमध्ये ९०१.४१ दशलक्ष घनमीटर, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये १४०३.८२ दशलक्ष घनमीटर, नाशिकच्या धरणांमध्ये ११६९.५६ दशलक्ष घनमीटर, पुण्याच्या धरणांमध्ये २६७८.३२ दशलक्ष घनमीटर, कोकणातील धरणांमध्ये ८७७.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.


महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांच्या तलावांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलाशयांमध्ये १९.१७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १३.६३ टक्के होता.


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये १८ हजार ६२४ दशलक्ष घनफूट अर्थात २८.३६ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २५०० दशलक्ष घनफूट अर्थात ४४.४० टक्के जलसाठा आहे. कश्यपीत ६५९ घनफूट अर्थात ३५.५८ टक्के, गौतमी गोदावरीत १६९ घनफूट अर्थात नऊ टक्के, आळंदीत १०३ घनफूट अर्थात १२.६२ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. इतर आठ धरणांमधील पाणीसाठा अल्प झाला आहे.


महाराष्ट्रातील सर्व मध्यम आकाराच्या धरणांमध्ये ३८.९८ टक्के तर लघू आकाराच्या धरणांमध्ये ३१.५५ टक्के तर महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये २९.९४ टक्के पाणीसाठा आहे.

Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची

Mumbai Rain Update: चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह उपनगरात पावसाचा पुन्हा जोर

मुंबई: बाप्पाच्या आगमनाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना मुंबईसह उपनगरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली