महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २८ टक्के पाणीसाठा

मुंबई : उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सर्वाधिक ३८.१३ टक्के पाणीसाठा अमरावती येथील धरणांत आहे.कोकणातील धरणांमध्ये ३४.१५ टक्के, नागपूर येथील धरणांमध्ये ३२.७९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये ३१.२३ टक्के, नाशिकच्या धरणांमध्ये ३१.३५ टक्के तर पुण्यातील धरणांमध्ये २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये १४,२५३.३६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यापैकी ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.


नागपूर येथील धरणांमध्ये ११३५.४ दशलक्ष घनमीटर, अमरावतीच्या धरणांमध्ये ९०१.४१ दशलक्ष घनमीटर, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये १४०३.८२ दशलक्ष घनमीटर, नाशिकच्या धरणांमध्ये ११६९.५६ दशलक्ष घनमीटर, पुण्याच्या धरणांमध्ये २६७८.३२ दशलक्ष घनमीटर, कोकणातील धरणांमध्ये ८७७.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.


महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांच्या तलावांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलाशयांमध्ये १९.१७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १३.६३ टक्के होता.


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये १८ हजार ६२४ दशलक्ष घनफूट अर्थात २८.३६ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २५०० दशलक्ष घनफूट अर्थात ४४.४० टक्के जलसाठा आहे. कश्यपीत ६५९ घनफूट अर्थात ३५.५८ टक्के, गौतमी गोदावरीत १६९ घनफूट अर्थात नऊ टक्के, आळंदीत १०३ घनफूट अर्थात १२.६२ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. इतर आठ धरणांमधील पाणीसाठा अल्प झाला आहे.


महाराष्ट्रातील सर्व मध्यम आकाराच्या धरणांमध्ये ३८.९८ टक्के तर लघू आकाराच्या धरणांमध्ये ३१.५५ टक्के तर महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये २९.९४ टक्के पाणीसाठा आहे.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील