रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना, मालगाडी रुळावरुन घसरली आणि...

जळगाव : अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली. अपघातामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरुन पडले आहेत. या अपघातामुळे आसपासच्या रुळांचेही नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनात रुळांच्या डागडुजीचे काम सुरू झाले. तसेच मालगाडीचे रुळांवर अस्ताव्यस्त पडलेले डबे उचलून व्यवस्थित एका बाजूस ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या नियमानुसार, अपाघाताची चौकशी होणार आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला निघालेल्या मालगाडीला अमळनेर स्थानकाजवळ अपघात झाला. गुरुवार १५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातात जीवितहानी झालेली नाही. पण रुळांचे नुकसान झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरत-भुसावळ रेल्वे या मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी करतात. या प्रवाशांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा