रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना, मालगाडी रुळावरुन घसरली आणि...

जळगाव : अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली. अपघातामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरुन पडले आहेत. या अपघातामुळे आसपासच्या रुळांचेही नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनात रुळांच्या डागडुजीचे काम सुरू झाले. तसेच मालगाडीचे रुळांवर अस्ताव्यस्त पडलेले डबे उचलून व्यवस्थित एका बाजूस ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या नियमानुसार, अपाघाताची चौकशी होणार आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला निघालेल्या मालगाडीला अमळनेर स्थानकाजवळ अपघात झाला. गुरुवार १५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातात जीवितहानी झालेली नाही. पण रुळांचे नुकसान झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरत-भुसावळ रेल्वे या मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी करतात. या प्रवाशांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

 
Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत