रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना, मालगाडी रुळावरुन घसरली आणि...

जळगाव : अमळनेर स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली. अपघातामुळे मालगाडीचे सहा डबे रुळावरुन घसरुन पडले आहेत. या अपघातामुळे आसपासच्या रुळांचेही नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनात रुळांच्या डागडुजीचे काम सुरू झाले. तसेच मालगाडीचे रुळांवर अस्ताव्यस्त पडलेले डबे उचलून व्यवस्थित एका बाजूस ठेवण्याचे काम सुरू झाले आहे. रेल्वेच्या नियमानुसार, अपाघाताची चौकशी होणार आहे.

भुसावळहून नंदूरबारच्या दिशेला निघालेल्या मालगाडीला अमळनेर स्थानकाजवळ अपघात झाला. गुरुवार १५ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सुरत-भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातात जीवितहानी झालेली नाही. पण रुळांचे नुकसान झाल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सुरत-भुसावळ रेल्वे या मार्गावरुन दररोज हजारो प्रवासी करतात. या प्रवाशांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

 
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे