Tiranga Yatra in Thane: भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ ठाण्यात भव्य तिरंगा यात्रा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उत्स्फूर्त सहभाग

ठाणे: ऑपरेशन सिंदूरद्वारे (Operation Sindoor) काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी विरुद्ध कारवाई, तसेच भारत पाक संघर्षात पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्यांच्या कामगिरीचा गौरव करण्या हेतू आज ठाणे शहरात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्याद्वारे भारतीय सैन्याचा पराक्रम जनतेपर्यन्त पोहोचवण्याचा, आणि त्यांच्या सामर्थ्याचे कौतुक करण्यात आले.


या यात्रेदरम्यान "वंदे मातरम", "भारत माता की जय" अशा देशभक्तिपूर्ण घोषणा देण्यात आल्या . यावेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर देशासाठी अभिमान आणि सैन्याच्या प्रति आदराची भावना झळकत होती. तिरंगा हातात घेऊन ठाणेकर उत्साहाने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ साडेतीन तास ही रॅली ठाण्याच्या विविध भागातून मार्गक्रमण करत होती.


या यात्रेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः यात सहभागी झाले होते. त्यांच्या सोबतच मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के आमदार रवींद्र फाटक, राम रेपाळे, हेमंत पवार, द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे, एकनाथ भोईर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.


या रॅलीची सुरुवात शासकीय विश्रामगृहासमोरून सुरुवात झाली, त्यानंतर ठाणे महानगरपालिका, गोखले रोड, वागळे इस्टेट, इंदिरानगर आणि पाचपाखाडी या मार्गांवरून ही रॅली जनतेचा उत्साह वाढवत पुढे सरकली. या रॅलीचा समारोप ठाणे महानगरपालिका भवनासमोर झाला.
Comments
Add Comment

Health Tips : रोजच्या आयुष्यातील 'या' १० सवयी आपल्या आरोग्यासाठी ठरू शकतात घातक; आजच करा बदल

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यातील काही सवयी अगदी सामान्य वाटतात. मात्र, त्यांचा सतत आणि दीर्घकाळ परिणाम शरीरावर

Raksha Bandhan Sweet Recipe : काजू रोलची ही रेसिपी वाचून बाजारातून मिठाई आणणं कायमचं विसरून जाल; रक्षाबंधनाला भावासाठी बनवा स्पेशल स्वीट

रक्षाबंधन म्हटलं की घराघरांत आनंदाचे वातावरण आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अनेकजण बाजारातून मिठाई आणतात,

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो