दादासाहेब फाळकेंच्या बायोपिकच्या निमित्ताने आमिर खान आणि राजकुमार हिरानी एकत्र येणार

मुंबई : भारतीय सिनेमाचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक येणार आहे आणि या ऐतिहासिक प्रकल्पामागे आहेत अभिनेता आमिर खान आणि दिग्गज दिग्दर्शक राजकुमार हिरानी ज्यांनी यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘पीके’ सारखे अविस्मरणीय सिनेमे दिले आहेत.

भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा आजपर्यंत हिंदी सिनेमात साकारण्यात आली नव्हती. मात्र आता ही सिनेमाच्या जन्माची कथा, सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडली जाणार आहे.हा चित्रपट स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्यांनी शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली.

या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनानंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत.

चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत.
Comments
Add Comment

Apurva Nemlekar: अपुर्वा नेमळेकरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का, पोस्ट करत...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत चाहत्यांना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

पाकिस्तानमध्ये बॉलिवूडप्रेमींसाठी 'धुरंधर'ची पायरसी जोरात

कराची : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा हिंदी चित्रपट भारतात सुपरहिट झाला. अनिवासी भारतीय पण मोठ्या संख्येने हा

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद