Rohit Sharma Virat Kohali : भाई भाई! निवृत्तीनंतरही विराट आणि रोहितचा ग्रेड ए+ करार कायम, BCCI सचिवांनी दिली माहिती

  25

मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापूर्वीच या दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळणार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या श्रेणीत बदल होईल का? हा प्रश्न पुढे आला आहे. यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी विराट आणि रोहित यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट श्रेणीबाबत मोठी अपडेट दिली आहे.


बीसीसीआयचे सचिव सैकिया म्हणाले की, 'रोहित शर्मा, विराट कोहली यांनी जरी टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील.' यामुळे हे स्पष्ट होते की, दोघांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. दोघांनाही बीसीसीआयकडून प्रति वर्ष सात कोटी रुपये मिळत राहतील.



बीसीसीआयने एप्रिलमध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची नवी यादी जाहीर केली होती. या यादीत बीसीसीआयने ३४ खेळाडूंचा समावेश केला, ज्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले. ही करार यादी १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी असणार आहे.


बीसीसीआय फक्त अशा खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करते ज्यांनी एका वर्षात किमान ३ कसोटी, ८ एकदिवसीय सामने किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर एखादा खेळाडू कसोटी खेळत नसेल पण एकदिवसीय आणि टी-२० खेळत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टचा भाग बनले जाते.

Comments
Add Comment

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी