महाकालचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात ISRO शास्त्रज्ञासह आई-वडिलांचा मृत्यू

बुलढाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासात चिरडून मृत्यू झाला. महाकालचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या नांदेडच्या पवार कुटुंबाची कार नादुरुस्त ट्रकवर आदळून तुफान अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत ISROमध्ये नुकतेच रुजू झालेले २६ वर्षीय शास्त्रज्ञ निकेतन पवार आणि त्यांचे आई-वडील जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरकाप उडवणारा प्रकार मंगळवारी पहाटे २ वाजता बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ घडला.


अपघातात मृत्युमुखी पडलेले देवराव पवार (६०), बबिता पवार (५५) आणि त्यांचा मुलगा निकेतन पवार (२६) हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लोकरवाडीचे रहिवासी होते. निकेतन नुकतेच ISROमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले होते. सुट्टीवर घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतले होते. मात्र परतीच्या वाटेवर या कुटुंबाचे भवितव्य थांबले.


या अपघातात मोनिका पवार, प्रियंका पवार, भूमिका पवार, हितांशी राठोड आणि कारचालक संतोष कदम हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



चुकीचा ट्रक थांबवला आणि तीन जीव घेतले!


अपघातामागे ट्रकचालकाची गंभीर हलगर्जी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचा टायर रिमोल्डिंग पट्टा निघाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबवण्यात आला होता. वाहनावर कुठलेही इंडिकेटर चालू नव्हते, चेतावणीही नव्हती. परिणामी भरधाव वेगातील इर्टिगा कार थेट त्या ट्रकवर आदळली आणि पवार कुटुंबीयांचा जीव गेला.


या घटनेनंतर नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात IPC कलम २८१, १०६(१), १२५(अ)(३), ३२४(४), ३२३(५) तसेच मोटार वाहन कायदा १८४, १३४/१७७, १२२/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.


एक बुद्धिमान तरुण शास्त्रज्ञ, उज्ज्वल भविष्य घेऊन देशाच्या सेवेसाठी सज्ज झालेला, आई-वडिलांसोबत महाकालचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका बेफिकीर ट्रकचालकाच्या हलगर्जीपणाने कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. या अपघाताने केवळ एक कुटुंबच नाही, तर एका संभाव्य वैज्ञानिकाची स्वप्नं, राष्ट्राची शक्ती आणि समाजाचे भविष्य हरपले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन