महाकालचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात ISRO शास्त्रज्ञासह आई-वडिलांचा मृत्यू

बुलढाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासात चिरडून मृत्यू झाला. महाकालचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या नांदेडच्या पवार कुटुंबाची कार नादुरुस्त ट्रकवर आदळून तुफान अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत ISROमध्ये नुकतेच रुजू झालेले २६ वर्षीय शास्त्रज्ञ निकेतन पवार आणि त्यांचे आई-वडील जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरकाप उडवणारा प्रकार मंगळवारी पहाटे २ वाजता बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ घडला.


अपघातात मृत्युमुखी पडलेले देवराव पवार (६०), बबिता पवार (५५) आणि त्यांचा मुलगा निकेतन पवार (२६) हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लोकरवाडीचे रहिवासी होते. निकेतन नुकतेच ISROमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले होते. सुट्टीवर घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतले होते. मात्र परतीच्या वाटेवर या कुटुंबाचे भवितव्य थांबले.


या अपघातात मोनिका पवार, प्रियंका पवार, भूमिका पवार, हितांशी राठोड आणि कारचालक संतोष कदम हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



चुकीचा ट्रक थांबवला आणि तीन जीव घेतले!


अपघातामागे ट्रकचालकाची गंभीर हलगर्जी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचा टायर रिमोल्डिंग पट्टा निघाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबवण्यात आला होता. वाहनावर कुठलेही इंडिकेटर चालू नव्हते, चेतावणीही नव्हती. परिणामी भरधाव वेगातील इर्टिगा कार थेट त्या ट्रकवर आदळली आणि पवार कुटुंबीयांचा जीव गेला.


या घटनेनंतर नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात IPC कलम २८१, १०६(१), १२५(अ)(३), ३२४(४), ३२३(५) तसेच मोटार वाहन कायदा १८४, १३४/१७७, १२२/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.


एक बुद्धिमान तरुण शास्त्रज्ञ, उज्ज्वल भविष्य घेऊन देशाच्या सेवेसाठी सज्ज झालेला, आई-वडिलांसोबत महाकालचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका बेफिकीर ट्रकचालकाच्या हलगर्जीपणाने कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. या अपघाताने केवळ एक कुटुंबच नाही, तर एका संभाव्य वैज्ञानिकाची स्वप्नं, राष्ट्राची शक्ती आणि समाजाचे भविष्य हरपले.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा