महाकालचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात ISRO शास्त्रज्ञासह आई-वडिलांचा मृत्यू

  39

बुलढाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या एका कुटुंबाचा परतीच्या प्रवासात चिरडून मृत्यू झाला. महाकालचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या नांदेडच्या पवार कुटुंबाची कार नादुरुस्त ट्रकवर आदळून तुफान अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत ISROमध्ये नुकतेच रुजू झालेले २६ वर्षीय शास्त्रज्ञ निकेतन पवार आणि त्यांचे आई-वडील जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा थरकाप उडवणारा प्रकार मंगळवारी पहाटे २ वाजता बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील खातखेड फाट्याजवळ घडला.


अपघातात मृत्युमुखी पडलेले देवराव पवार (६०), बबिता पवार (५५) आणि त्यांचा मुलगा निकेतन पवार (२६) हे नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील लोकरवाडीचे रहिवासी होते. निकेतन नुकतेच ISROमध्ये शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले होते. सुट्टीवर घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन घेतले होते. मात्र परतीच्या वाटेवर या कुटुंबाचे भवितव्य थांबले.


या अपघातात मोनिका पवार, प्रियंका पवार, भूमिका पवार, हितांशी राठोड आणि कारचालक संतोष कदम हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



चुकीचा ट्रक थांबवला आणि तीन जीव घेतले!


अपघातामागे ट्रकचालकाची गंभीर हलगर्जी जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. ट्रकचा टायर रिमोल्डिंग पट्टा निघाल्यामुळे ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबवण्यात आला होता. वाहनावर कुठलेही इंडिकेटर चालू नव्हते, चेतावणीही नव्हती. परिणामी भरधाव वेगातील इर्टिगा कार थेट त्या ट्रकवर आदळली आणि पवार कुटुंबीयांचा जीव गेला.


या घटनेनंतर नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात IPC कलम २८१, १०६(१), १२५(अ)(३), ३२४(४), ३२३(५) तसेच मोटार वाहन कायदा १८४, १३४/१७७, १२२/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.


एक बुद्धिमान तरुण शास्त्रज्ञ, उज्ज्वल भविष्य घेऊन देशाच्या सेवेसाठी सज्ज झालेला, आई-वडिलांसोबत महाकालचे दर्शन घेऊन घरी परतत असताना एका बेफिकीर ट्रकचालकाच्या हलगर्जीपणाने कायमचा काळाच्या पडद्याआड गेला. या अपघाताने केवळ एक कुटुंबच नाही, तर एका संभाव्य वैज्ञानिकाची स्वप्नं, राष्ट्राची शक्ती आणि समाजाचे भविष्य हरपले.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या