मुंबईतील ३,५०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी? महापालिकेपुढे यक्ष प्रश्न!

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती; देवनार डम्पिंगवर सुद्धा टांगती तलवार


उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिका मागणार दाद


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात वन शक्ती संस्थेने दाखल केलेल्या रिट याचिकेमुळे न्यायालयाने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड वन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात आता मुंबई महापालिका सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असून, महापालिका आपली बाजू मांडण्यासाठी दाद मागणार आहे.


या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली असून, लवकरच महापालिकेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यामुळे कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. हा डम्पिंग ग्राऊंड मिळावा, यासाठी महापालिका सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार असून त्यासाठी राज्य सरकारला सुद्धा विनंती करणार आहे.


मुंबई शहरांतून दररोज ४ हजार ५०० मेट्रिक टन कचरा वाहिला जातो. यापैकी ३ हजार ५०० मेट्रिक टन कचरा हा एकट्या कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. यामुळे जर कांजूरमार्ग डम्पिंग बंद झाले तर मुंबईतील ३ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्यांची विल्हेवाट लावायची कशी? असा प्रश्न महापालिकेपुढे निर्माण होऊ शकतो.


शहरांत इतरत्र डम्पिंगसाठी भूखंड आरक्षित किंवा शिल्लक नाहीत, अशा सर्व परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. यासाठी महापालिका राज्य सरकारच्या वकिलांची मदत घेण्याच्या तयारीत असून, वेळ प्रसंगी सरकारला सुद्धा सदर प्रकरणी लक्ष घालण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील प्रशासनाकडून देण्यात आली.



देवनार डम्पिंगवर सुद्धा टांगती तलवार


१३२ हेक्टरचा भूखंड असलेल्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर मुंबईतील दररोज सुमारे ५ हजार ५०० मेट्रिक टन कचरा टाकला जातो. मात्र भविष्यात यामध्ये ७० एकर जागाही धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी तर काही जागा वीज निर्मितीकरिता वापरण्यात येणार आहे. यामुळे देवनार डम्पिंगवर सुद्धा बंद होण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे उर्वरित जागेवर कचरा डम्पिंग करणे मुंबई महापालिकेला शक्य नसल्याने तोही हातातून गेल्यास, मुंबईत कचरा डम्पिंग करण्यासाठी महापालिकेकडे जागा शिल्लक राहणार नाही. परिणामी भविष्यात शहरांत कचरा कोंडी निर्माण होऊ शकते, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त