Operation Sindoor: विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन

  59

मुंबई: ऑपरेशन सिंदूरनंतर विदेश मंत्री एस जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये विदेश मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. अनेक महत्वाच्या आणि पडद्यामागील गोष्टींमुळे, सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या जीवाला देखील त्याचा धोका असण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची धडक करावी केली. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, लष्करी कारवायापर्यंत हा तणाव वाढला. मात्र, सध्या भारत पाकदरम्यानच्या अघोषित युद्धाला आता विराम मिळाला आहे. असे असले तरी, पाकड्या आपल्या कुरापती करणं सोडत नाहीय. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.



बुलेटप्रूफ कारमध्ये काय सुविधा असतील?


विदेश मंत्री जयशंकर यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली बुलेटप्रूफ कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या कारच्या काचा खूप जाड असतात आणि त्या लॅमिनेटेड केलेल्या असतात. ज्यामुळे कोणत्याही बंदुकीची गोळी त्याला भेदून आत जाऊ शकत नाही. तसेच या कारचा टायर पंक्चर जरी झाला तरी ते ५० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. प्रत्येक प्रकारचे हल्ले लक्षात घेऊन या कारची डिझाइन केली गेली आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके