Operation Sindoor: विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन

मुंबई: ऑपरेशन सिंदूरनंतर विदेश मंत्री एस जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये विदेश मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. अनेक महत्वाच्या आणि पडद्यामागील गोष्टींमुळे, सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या जीवाला देखील त्याचा धोका असण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची धडक करावी केली. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, लष्करी कारवायापर्यंत हा तणाव वाढला. मात्र, सध्या भारत पाकदरम्यानच्या अघोषित युद्धाला आता विराम मिळाला आहे. असे असले तरी, पाकड्या आपल्या कुरापती करणं सोडत नाहीय. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.



बुलेटप्रूफ कारमध्ये काय सुविधा असतील?


विदेश मंत्री जयशंकर यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली बुलेटप्रूफ कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या कारच्या काचा खूप जाड असतात आणि त्या लॅमिनेटेड केलेल्या असतात. ज्यामुळे कोणत्याही बंदुकीची गोळी त्याला भेदून आत जाऊ शकत नाही. तसेच या कारचा टायर पंक्चर जरी झाला तरी ते ५० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. प्रत्येक प्रकारचे हल्ले लक्षात घेऊन या कारची डिझाइन केली गेली आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)

Nitish Kumar: नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरही झेड+ सुरक्षा राहणार; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपद

BJP Office Blast: खलिस्तानी दहशतवादी सुखजिंदर सिंग बब्बरने स्वीकारली भाजप मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी

चंदीगडमध्ये भाजपच्या पंजाब मुख्यालयाबाहेर बुधवारी (१ एप्रिल) संध्याकाळी ५ वाजता स्फोट झाला. स्फोटानंतर तेथे

Indonesia: इंडोनेशियामध्ये भूकंप, त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली: पूर्व इंडोनेशियामध्ये गुरुवारी सकाळी मोठा भूकंप झाला, ज्यामुळे भीती पसरली. रिश्टर स्केलवर ७.४