Operation Sindoor: विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन

  64

मुंबई: ऑपरेशन सिंदूरनंतर विदेश मंत्री एस जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये विदेश मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. अनेक महत्वाच्या आणि पडद्यामागील गोष्टींमुळे, सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या जीवाला देखील त्याचा धोका असण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची धडक करावी केली. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, लष्करी कारवायापर्यंत हा तणाव वाढला. मात्र, सध्या भारत पाकदरम्यानच्या अघोषित युद्धाला आता विराम मिळाला आहे. असे असले तरी, पाकड्या आपल्या कुरापती करणं सोडत नाहीय. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.



बुलेटप्रूफ कारमध्ये काय सुविधा असतील?


विदेश मंत्री जयशंकर यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली बुलेटप्रूफ कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या कारच्या काचा खूप जाड असतात आणि त्या लॅमिनेटेड केलेल्या असतात. ज्यामुळे कोणत्याही बंदुकीची गोळी त्याला भेदून आत जाऊ शकत नाही. तसेच या कारचा टायर पंक्चर जरी झाला तरी ते ५० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. प्रत्येक प्रकारचे हल्ले लक्षात घेऊन या कारची डिझाइन केली गेली आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने