Operation Sindoor: विदेश मंत्री एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवली, ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन

  50

मुंबई: ऑपरेशन सिंदूरनंतर विदेश मंत्री एस जयशंकर (Foreign Minister S. Jaishankar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली असून, त्यांच्या ताफ्यात बुलेटप्रूफ वाहन जोडण्यात आले आहे.


ऑपरेशन सिंदूरमध्ये विदेश मंत्री जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याआधी आणि नंतरही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सतत बैठका घेत होते. अनेक महत्वाच्या आणि पडद्यामागील गोष्टींमुळे, सध्याची परिस्थिती पाहता एस जयशंकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या जीवाला देखील त्याचा धोका असण्याची शक्यता लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरची धडक करावी केली. त्यांनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, लष्करी कारवायापर्यंत हा तणाव वाढला. मात्र, सध्या भारत पाकदरम्यानच्या अघोषित युद्धाला आता विराम मिळाला आहे. असे असले तरी, पाकड्या आपल्या कुरापती करणं सोडत नाहीय. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता विदेश मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून. त्याच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ कार देण्यात आली आहे.



बुलेटप्रूफ कारमध्ये काय सुविधा असतील?


विदेश मंत्री जयशंकर यांच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेली बुलेटप्रूफ कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. या कारच्या काचा खूप जाड असतात आणि त्या लॅमिनेटेड केलेल्या असतात. ज्यामुळे कोणत्याही बंदुकीची गोळी त्याला भेदून आत जाऊ शकत नाही. तसेच या कारचा टायर पंक्चर जरी झाला तरी ते ५० किलोमीटरपेक्षा जास्त धावू शकते. प्रत्येक प्रकारचे हल्ले लक्षात घेऊन या कारची डिझाइन केली गेली आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.