Operation Sindoor : 'दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश दोघांनाही धडा शिकवणार'

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धविरामानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिलाय. भारतीय सैन्याला स्वातंत्र्य दिलंय. त्यातच पाकिस्तान जर न्युक्लियर ब्लॅकमेलिंग करणार असेल तर भारत पाकिस्तानला धडा शिकवायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिलाय. भारताने दहशतवादीविरोधी कारवाईला स्थगिती दिलीय खरी, मात्र पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर जशास तसा धडा शिकवण्याचा निर्धारही केलाय. माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा नाशही केलाय. आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांना मारल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय.


दहशतवाद्यांच्या क्रूरतेने जगाला मोठा धक्का बसलाय. निष्पापांची क्रूर हत्या हा दहशतीचा भयानक चेहरा जगासमोर आलाय. तेव्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला तर भारत आपला निर्णय बदलू शकतो, असा सूचक इशाराही पंतप्रधान मेदींनी दिलाय. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही तर त्यांचे मनोबलही डळमळीत झालंय.


?si=iPTv2DHAC1acNE8H

भारताने दहशतवादाविरूद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरच्या तीन रेषा आखल्या आहेत, पाहूयात पुढीलप्रमाणे


पहिली रेषा


१. दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य उत्तर देणार
२. भारत आपल्या पद्धतीने प्रतिसाद देणार
३. भारत स्वतःच्या अटींवर उत्तर देणार
४. दहशतवाद्यांची पाळमुळे उपटण्यासाठी कडक कारवाई करणार



दुसरी रेषा


१.भारत न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
२. दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल



तिसरी रेषा


१. दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवणार
२. दहशतवाद्यांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांना वेगळा घटक म्हणून पाहणार नाही
३. भारत आणि त्याच्या नागरिकांना धोक्यापासून वाचवण्यासाठी निर्णायक पावले उचलणार


पंतप्रधान मोदी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आता पाकिस्तानशी चर्चा होईल ती दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरबाबतच असा सज्जड दमही दिलाय. इतकं सांगूनही पाकिस्तान ऐकणार नसेल तर भारताला निर्णयक पाऊल उचलावंच लागेल आणि तीच तमाम भारतीयांची भावना असेल.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर