Operation Sindoor : 'दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश दोघांनाही धडा शिकवणार'

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान युद्धविरामानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिलाय. भारतीय सैन्याला स्वातंत्र्य दिलंय. त्यातच पाकिस्तान जर न्युक्लियर ब्लॅकमेलिंग करणार असेल तर भारत पाकिस्तानला धडा शिकवायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही दिलाय. भारताने दहशतवादीविरोधी कारवाईला स्थगिती दिलीय खरी, मात्र पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर जशास तसा धडा शिकवण्याचा निर्धारही केलाय. माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा नाशही केलाय. आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांना मारल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय.


दहशतवाद्यांच्या क्रूरतेने जगाला मोठा धक्का बसलाय. निष्पापांची क्रूर हत्या हा दहशतीचा भयानक चेहरा जगासमोर आलाय. तेव्हा पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा दिला तर भारत आपला निर्णय बदलू शकतो, असा सूचक इशाराही पंतप्रधान मेदींनी दिलाय. भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनांच्या इमारतीच नाही तर त्यांचे मनोबलही डळमळीत झालंय.


?si=iPTv2DHAC1acNE8H

भारताने दहशतवादाविरूद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरच्या तीन रेषा आखल्या आहेत, पाहूयात पुढीलप्रमाणे


पहिली रेषा


१. दहशतवादी हल्ला झाल्यास योग्य उत्तर देणार
२. भारत आपल्या पद्धतीने प्रतिसाद देणार
३. भारत स्वतःच्या अटींवर उत्तर देणार
४. दहशतवाद्यांची पाळमुळे उपटण्यासाठी कडक कारवाई करणार



दुसरी रेषा


१.भारत न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही
२. दहशतवादी अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक हल्ला करेल



तिसरी रेषा


१. दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवणार
२. दहशतवाद्यांच्या पडद्यामागच्या सूत्रधारांना वेगळा घटक म्हणून पाहणार नाही
३. भारत आणि त्याच्या नागरिकांना धोक्यापासून वाचवण्यासाठी निर्णायक पावले उचलणार


पंतप्रधान मोदी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी आता पाकिस्तानशी चर्चा होईल ती दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरबाबतच असा सज्जड दमही दिलाय. इतकं सांगूनही पाकिस्तान ऐकणार नसेल तर भारताला निर्णयक पाऊल उचलावंच लागेल आणि तीच तमाम भारतीयांची भावना असेल.

Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची