उत्तरा केळकर यांना पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा घरगुती वातावरणात २८ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" जेष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता पौडवाल, नितीन तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

ज्या कलाकारांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत काम केले आहे अशा कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे अनुराधा पौडवाल म्हणाल्या.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर म्हणाल्या, "हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते, माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. ते अनिल - अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला, मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे."

पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी झाला. या प्रसंगी उत्तरा केळकर यांनी 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली' हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले. याप्रसंगी 'अशी ही बनवाबनावी' मधील गीतकार सुधीर मोघे लिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं 'कोणी तरी येणार येणार गं' या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन चंद्रशेखर महामुनी यांनी केले.
Comments
Add Comment

‘व्ही. शांताराम’ यांचे जीवन मेगा बायोपिकच्या रूपात

भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’!

सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ हा हृदयस्पर्शी आणि नात्यांच्या उबदार धाग्यांनी

अलविदा ही मॅन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ चित्रपट चर्चेत; रणवीर, माधवन, रामपाल कोणाची भूमिका साकारतायत?

मुंबई : बॉलिवूडचा ऊर्जावान अभिनेता रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलिजच्या प्रतिक्षेत असून,

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’