उत्तरा केळकर यांना पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई : अकॉर्डियन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा घरगुती वातावरणात २८ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार" जेष्ठ गायिका उत्तरा केळकर यांना प्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कविता पौडवाल, नितीन तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. पुरस्काराचे स्वरुप ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे आहे.

ज्या कलाकारांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत काम केले आहे अशा कलावंतांचा या पुरस्कारासाठी प्राधान्याने विचार केला जातो. जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांनी अरुण पौडवाल यांच्यासोबत खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे अनुराधा पौडवाल म्हणाल्या.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना जेष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर म्हणाल्या, "हा पुरस्कार मी अतिशय जबाबदारीने आणि नम्रतेने स्वीकारते, माझ्यासाठी हा पुरस्कार अत्यंत महत्वाचा आहे. ते अनिल - अरुण या जोडीने संगीत देत होते तेव्हाही व त्यानंतर स्वतंत्र झाल्यावरही मी त्यांच्यासाठी अनेक गाणी गायली आहेत. त्यांच्यासोबत काम करताना समृद्ध करणारा दीर्घ अनुभव मला आला आहे. आपल्या घरात अत्यंत प्रतिभावंत आणि लोकप्रिय गायिका असतानाही त्यांनी माझा एका ड्युएट गाण्यासाठी गायिका म्हणून विचार केला, मात्र निर्मात्यांच्या आग्रहामुळे मला ते गाणे देता येत नाही ही खंत त्यांनी बोलून दाखविली, असं सांगण्यासाठीही फार मोठं मन लागतं. अरुणजी हे अफाट कलागुण असलेले महान संगीतकार होते. आज अनुराधा यांच्याकडून त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारताना अनेक आठवणींना उजाळा मिळाला आहे."

पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईत अनुराधा पौडवाल यांच्या निवास्थानी झाला. या प्रसंगी उत्तरा केळकर यांनी 'माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली' हे अप्रतिम भक्तिगीत सादर केले. याप्रसंगी 'अशी ही बनवाबनावी' मधील गीतकार सुधीर मोघे लिखित व संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेले व अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर यांनी गायलेलं 'कोणी तरी येणार येणार गं' या गीताच्या आठवणींद्वारे जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन चंद्रशेखर महामुनी यांनी केले.
Comments
Add Comment

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी