एअरबेसवर पोहोचले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हवाई तळावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.



पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवरची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. पण याच हवाई तळाला भेट देऊन आणि अधिकारी - कर्मचारी यांच्याशी संवाद साधून पंतप्रधान मोदींनी आदमपूरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे सप्रमाण दाखवून दिले.



याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. यानंतर १२ मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी प्राथमिक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर मंगळवार १३ मे रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी १२ मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. या भाषणात त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात देणे आणि अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देणे या दोन मुद्यांवर थेट भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होईल. इतर कोणत्याही मुद्यावर भारत चर्चा करणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ बंद करावे आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, मदत देणे तसेच मार्गदर्शन करणे थांबवावे. भारत आता दहशतवादी आणि दहशतवाद्यांना मदत करणारा देश यात फरक करणार नाही. पुन्हा जर दहशतवादी हल्ला झाला तर भारत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश या दोघांविरोधात कारवाई करेल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. भारताच्या दहशतवादाबाबतच्या धोरणातला हा बदल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या सीमेजवळलील हवाई तळांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने सैन्याचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि

Melody Tiramisu Flavour : 'मेलोडी'चा नवीन इटालियन ट्विस्ट! मोदींनी मेलोनींना दिलेल्या 'त्या' गिफ्टवरून पारलेने लाँच केला 'Melody Tiramisu'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांच्यातील

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

CJP Protest Case : 'गुन्हेगारांना सोडणार नाही'; CJP आंदोलन प्रकरणी केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट विधान

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि शैक्षणिक सुधारणांविरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल करण्यात

Kangana Ranaut : "होय, मी मवाळ हिंदू होते; पण आता...भूतकाळातील टीकेवर कंगना रणौतचे टीकाकारांना चोख उत्तर

नवी दिल्ली : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना