एअरबेसवर पोहोचले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हवाई तळावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.



पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवरची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. पण याच हवाई तळाला भेट देऊन आणि अधिकारी - कर्मचारी यांच्याशी संवाद साधून पंतप्रधान मोदींनी आदमपूरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे सप्रमाण दाखवून दिले.



याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. यानंतर १२ मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी प्राथमिक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर मंगळवार १३ मे रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी १२ मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. या भाषणात त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात देणे आणि अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देणे या दोन मुद्यांवर थेट भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होईल. इतर कोणत्याही मुद्यावर भारत चर्चा करणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ बंद करावे आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, मदत देणे तसेच मार्गदर्शन करणे थांबवावे. भारत आता दहशतवादी आणि दहशतवाद्यांना मदत करणारा देश यात फरक करणार नाही. पुन्हा जर दहशतवादी हल्ला झाला तर भारत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश या दोघांविरोधात कारवाई करेल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. भारताच्या दहशतवादाबाबतच्या धोरणातला हा बदल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या सीमेजवळलील हवाई तळांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने सैन्याचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
Comments
Add Comment

Sanjeev Arora ED Custody : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे उद्योग मंत्री संजीव अरोरा ईडीच्या ताब्यात

- ईडीने संजीव अरोरा यांच्याशी संबंधित १५७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती केली जप्त पंजाब : अंमलबजावणी

Assam Earthquake : आसामच्या तीन जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; कोकराझारमध्ये सर्वाधिक ४.५ तीव्रतेची नोंद

आसाम : आसाममधील धुबड़ी, कोकराझार आणि बंगाईगांव जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच शनिवार ९ मे रोजी वेगवेगळ्या वेळेस

S. Jaishankar and Brian Lara : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि क्रिकेटपटू ब्रायन लाराची खास भेट; ‘भारत-त्रिनिदाद नात्याचा सर्वात मजबूत दुवा म्हणजे क्रिकेट’

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी त्यांच्या तीन देशांच्या कॅरिबियन दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात घसरण, आजचे दर काय ?

Gold-Silver Price Today : सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दागिने, चांदीची भांडी किंवा अजून काही वस्तू

Iran - America War : अमेरिका - इराण हल्ल्यात भारतीय जहाज बुडाले: एकाचा मृत्यू

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ताज्या संघर्षात एका भारतीय मालवाहू जहाजावर

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! दिल्लीत होणार महत्त्वाची बैठक, पगारवाढीसह ‘या’ मागण्यांवर चर्चा

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगाच्या