भारताच्या हल्ल्यात ११ सैनिक ठार, पाकिस्तानची कबुली

  50

इस्लामाबाद : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेकी तळांना लक्ष्य करुन भारताने हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या सैन्य तळांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अयशस्वी झाला. नंतर भारताने पाकिस्तानच्या सैन्य तळांना लक्ष्य करुन हल्ले केले. यापैकी एका हल्ल्यात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाले. तसेच पाकिस्तानचे ७८ सैनिक जखमी झाले.


सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने अखेर भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिक ठार झाल्याची कबुली दिली. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने अर्थात आयएसपीआरने भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाल्याचे आणि ७८ सैनिक जखमी झाल्याचे कबुल केले. आयएसपीआरने भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाकिस्तानच्या ११ सैनिकांची नावं जाहीर केली आहेत.


भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या पाकिस्तानच्या ११ सैनिकांची नावं




  1. नायक अब्दुल रहमान, भूदल

  2. लान्स नायक दिलावर खान, भूदल

  3. लान्स नायक इक्रामुल्ला, भूदल

  4. नायक वकार खालिद, भूदल

  5. शिपाई मुहम्मद अदिल अकबर, भूदल

  6. शिपाई निसार, भूदल

  7. स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसुफ, हवाई दल

  8. मुख्य तंत्रज्ञ औरंगजेब, हवाई दल

  9. वरिष्ठ तंत्रज्ञ नजीब, हवाई दल

  10. कॉर्पोरल टेक्निशियन फारुख, हवाई दल

  11. वरिष्ठ तंत्रज्ञ मुबशीर, हवाई दल


ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या हवाई हल्ल्यात १०० पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. तसेच पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ, अतिरेक्यांचे लाँचपॅड, ड्रोनचे लाँचपॅड आणि पाकिस्तानच्या सैन्य तळांचे प्रचंड नुकसान झाले.

Comments
Add Comment

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Russia Ukraine War: रशियाचा युक्रेनवर ४० क्षेपणास्त्रे आणि ४०० ड्रोनचा भयंकर हल्ला!

रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वर्षाव कीव्ह: रशियाने शुक्रवारी सकाळी

बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६मध्ये होणार निवडणूक, मुहम्मद युनूस यांनी केली घोषणा

ढाका: बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद यूनुस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची

या ठिकाणी पाच रुपयांचा पार्ले जी बिस्किटांचा पुडा २३०० रुपयांत मिळतो

गाझा : पार्ले जी बिस्कीट एक लोकप्रिय ब्रँड आहे. भारतात मागील अनेक दशकांपासून पार्ले जी बिस्किटांची विक्री सुरू

विनाश ७ जून नंतर अटळ, बाबा वेंगाचे भाकीत

बल्गेरिया : बल्गेरिया येथील बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी या नावाने एक भाकीत व्हायर होत आहे. या भाकितानुसार

Shashi Tharoor : 'भारताला कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नाही', राहुल गांधींच्या विधानावर थरूर यांची प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत वॉशिंग्टन : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान